कर्नाटकातील बागलकोटमध्ये शिवजयंती मिरवणुकीवर मशिदीतून दगडफेक

पोलिसांच्या कडक बंदोबस्तात मिरवणूक सुरू असतानाही दगडफेक

कर्नाटकातील बागलकोटमध्ये शिवजयंती मिरवणुकीवर मशिदीतून दगडफेक

कर्नाटकातील बागलकोट येथे शिवजयंती मिरवणुकीदरम्यान दगडफेकीची घटना घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (२० फेब्रुवारी) दिली.

ही घटना गुरुवारी (१९ फेब्रुवारी) जुन्या शहर भागात घडली. दुपारी सुमारे ३:३० वाजता सुरू झालेली मिरवणूक मशिदीच्या परिसरातून जात असताना काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याचा आरोप आहे. मशिदीतून दगडफेक, चप्पलफेक केल्याचा आरोप करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक सिद्धार्थ गोयल यांनी सांगितले की, मिरवणुकीसाठी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ते म्हणाले, “आम्ही सर्वजण घटनास्थळी उपस्थित होतो. मिरवणूक सुमारे ३:३० वाजता सुरू झाली. ती मशिदीजवळ पोहोचताच काही अंतरावरून दोन दगड आमच्याकडे फेकण्यात आले.”

प्राथमिक माहिती आणि पोलिसांनी तपासलेल्या व्हिडिओंनुसार, एक दगड पोलीस कॉन्स्टेबलला लागला, तर दुसरा त्याच्या खांद्यावर पडला. “कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. त्यानंतर मिरवणूक सुरळीतपणे पुढे सुरू राहिली आणि परिसरातील वातावरण शांत राहिले,” असे गोयल यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

एआय समिटमध्ये काँग्रेसचा तमाशा; ‘उघडेबाबांना’ अटक

सोन्याची दमदार झेप, चांदीची चौकार उसळी

भारताची एआय नेतृत्वाकडे दमदार वाटचाल

ट्रम्प यांचा ओबामांवर आरोप

कडक सुरक्षा व्यवस्था

पोलिसांनी सांगितले की, मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर योग्य ती सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. “घटना घडलेल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. मिरवणुकीचेही चित्रीकरण करण्यात आले आहे. आम्ही व्हिडिओ फुटेजची तपासणी करत आहोत. यात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.

प्रतिबंधात्मक आदेश लागू

दरम्यान, भारतीय न्याय संहिता कलम १६३ अंतर्गत बागलकोटच्या काही भागात १९ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

या आदेशांनुसार: सार्वजनिक ठिकाणी चारपेक्षा जास्त व्यक्तींची गर्दी करण्यास मनाई, धोकादायक शस्त्रे बाळगण्यास बंदी, सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कृतींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तर पूर्वपरवानगीशिवाय सभा, कार्यक्रम किंवा धरणे आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रभावित भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version