28 C
Mumbai
Monday, March 17, 2025
घरधर्म संस्कृती'हिंदुस्थानशी प्रेम करायचे असेल तर होळीबद्दल असलेला द्वेष संपवावा लागेल'

‘हिंदुस्थानशी प्रेम करायचे असेल तर होळीबद्दल असलेला द्वेष संपवावा लागेल’

आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

कल्कि धामचे पीठाधीश्वर आणि माजी काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी होळी आणि हिंदुस्थानच्या एकतेबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं, “जर तुम्हाला हिंदुस्थानशी प्रेम असेल, तर होळीशी द्वेष करणं थांबवावं लागेल.”
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्याच्या धमकीबाबत प्रतिक्रिया देताना, आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, “धमक्या दहशतवाद्यांचं काम असतं. भारत कोणालाही घाबरत नाही. भारत ISIS ला घाबरत नाही, हिजबुल मुजाहिद्दीनला घाबरत नाही, खलिस्तान्यांना घाबरत नाही. भारत आतापर्यंत दहशतवाद्यांपासून ना घाबरलाय, ना कधी घाबरेल.”

त्यांनी पर्सनल लॉ बोर्डाच्या जबाबदार लोकांना आवाहन केलं की, “या देशाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. हा देश तुमचाच आहे आणि तुम्ही या मातीतच जन्म घेतला आहात, इथेच दफन होणार आहात. पण देशाला धमकी देणारा देशभक्त असू शकत नाही.”

उत्तर प्रदेशच्या मंत्र्याच्या विधानावर प्रतिक्रिया उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री रघुराज सिंग यांनी होळीवर वादग्रस्त विधान केलं होतं – मुस्लिम पुरुषांनीही हिजाब घाला, तर रंगापासून तुमचा बचाव होईल. यावर प्रतिक्रिया देताना आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, “होळी हिंदू-मुसलमानांमध्ये विभागणी करण्याची गोष्ट नाही. ही संपूर्ण हिंदुस्थानची होळी आहे.
ज्याला होळीबद्दल द्वेष आहे, त्याला हिंदुस्थानबद्दल प्रेम कसं असू शकतं?”

हे ही वाचा:

बांगलादेशात सोन्याचे दुकान लुटून हिंदू सोनाराची हत्या!

जीएसटी उपायुक्तानेच मागितली होती १५ लाखांची लाच… दोघांविरुद्ध मुंबईत गुन्हा

उत्तर प्रदेश: दुचाकीवरून आले इंजेक्शन देऊन पळून गेले, भाजपा नेत्याचा मृत्यू!

बलिया मेडिकल कॉलेजमध्ये मुस्लिम नको, त्यांच्यासाठी वेगळी इमारत बांधा!

धार्मिक सणांबाबत महत्त्वाचा संदेश

ते पुढे म्हणाले, “कधी कुठल्या हिंदू नेत्याने म्हटलंय की ईद साजरी करू नका? कधी कुठल्या मोठ्या पदावरील व्यक्तीने म्हटलंय की आम्हाला ईदबद्दल द्वेष आहे? कोणत्याही हिंदूने म्हटलंय की मुहर्रम साजरा करू नका? हा देश अतिशय सुंदर आहे, त्याला बिघडवू नका.”

“ज्याला होळी आवडत नाही, तो या देशाचा असू शकत नाही,” असं ठाम मत मांडत त्यांनी लोकांना आवाहन केलं, “देशाचं बनून राहा आणि एकत्र येऊन होळी साजरी करा.” त्यांनी सांगितलं की, “एकतर्फी प्रेम बोलणं आणि खरंच प्रेम करणं यात फरक आहे. आपण प्रेम वाढवायला पाहिजे, देशाला एकत्र आणायला पाहिजे, आणि हिंदुस्थानला अजून सुंदर बनवायला हवं.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
236,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा