34 C
Mumbai
Saturday, March 15, 2025
घरविशेषदेवभूमी उत्तराखंड अध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण

देवभूमी उत्तराखंड अध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील मुखवा गावातील मुखीमठ मंदिरात पूजा-अर्चना केली. त्यानंतर हर्षिल येथे ट्रेक आणि बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवून त्यांनी भव्य जनसभेला संबोधित केले. उत्तराखंड ही देवभूमी आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, उत्तराखंड ही देवभूमी आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण आहे. या भूमीला चारधाम आणि अनंत तीर्थांचे आशीर्वाद लाभले आहेत. जीवनदायिनी गंगा मातेच्या या शीतकालीन गादीस्थळी पुन्हा एकदा येऊन, तुम्हा सर्व परिवारजनांना भेटून मी स्वतःला धन्य समजतो. माँ गंगेच्या कृपेनेच मला सेवा करण्याचा योग आला, असेही ते म्हणाले.

हेही वाचा..

डीप-टेक इनोव्हेशन भारताला १० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणार

अमेरिकेतील घुसखोरांना मायदेशी पाठवण्याचा खर्च ३० लाख डॉलर्स, उड्डाणे स्थगित

अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या!

विधानपरिषद निवडणुकीतील विजय समृद्ध तेलंगणा निर्मितीचे पाऊल

ते म्हणाले, माँ गंगेच्या कृपेनेच मला अनेक दशके उत्तराखंडची सेवा करण्याचा योग आला. मला असे वाटते की त्यांच्याच आशीर्वादाने मी काशीपर्यंत पोहोचलो आणि आता खासदार म्हणून काशीची सेवा करत आहे. म्हणूनच मी काशीमध्ये म्हटले होते की, ‘माँ गंगेने मला बोलावले आहे’. काही महिन्यांपूर्वी मला हेही जाणवले की जणू माँ गंगेने आता मला दत्तक घेतले आहे. त्यामुळेच मी त्यांच्या मायके, मुखवा येथे आलो आहे.”
काही वर्षांपूर्वी जेव्हा मी बाबा केदारनाथांच्या चरणी दर्शनासाठी आलो होतो, तेव्हा अचानक माझ्या तोंडून शब्द आले की, ‘हा दशक उत्तराखंडचा दशक असेल’. हे माझे शब्द होते, माझी भावना होती, पण यामागे सामर्थ्य देण्याचे काम खुद्द बाबा केदारनाथांनी केले. आणि आज मी पाहतोय की त्यांच्या आशीर्वादाने हळूहळू हे सत्यात उतरत आहे.

डबल इंजिन सरकारमुळे उत्तराखंडचा जलद विकास, चारधाम ऑल वेदर रोड, आधुनिक एक्सप्रेस वे, रेल्वे, विमान आणि हेलिकॉप्टर सेवा विस्तार हे सर्व प्रकल्प गेल्या १० वर्षांत वेगाने पार पडले आहेत. कालच केंद्रीय कॅबिनेटने केदारनाथ रोपवे आणि हेमकुंड रोपवे प्रकल्प मंजूर केला. केदारनाथ रोपवे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जी यात्रा ८-९ तासांत पूर्ण होत होती, ती आता फक्त ३० मिनिटांत पूर्ण होईल. त्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांसाठी यात्रा अधिक सुलभ होईल. पर्यटन हे उत्तराखंडसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मी इच्छितो की येथे कोणताही ऑफ-सीजन नसावा, प्रत्येक सीजन हा टुरिझम-ऑन असावा, असे ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
235,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा