घरदेश दुनियाविशाखापट्टणम किनाऱ्याजवळ सहा मच्छीमार बेपत्ता

विशाखापट्टणम किनाऱ्याजवळ सहा मच्छीमार बेपत्ता

युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम किनाऱ्याजवळ सहा मच्छीमारांसह गेलेली मासेमारीची बोट बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बोटीशी संपर्क तुटल्यानंतर भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, सागरी पोलीस आणि मत्स्य विभागाने संयुक्तपणे व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या खराब हवामान आणि उंच लाटांमुळे बचावकार्य अत्यंत कठीण बनले आहे.

ही मासेमारीची बोट १ जुलै रोजी विशाखापट्टणम फिशिंग हार्बरमधून समुद्रात गेली होती. नियोजनानुसार ती ४ जुलैपर्यंत परत येणे अपेक्षित होते. मात्र, समुद्रात असताना बोटीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मच्छीमारांनी दिली होती. त्यानंतर त्यांच्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आणि त्यांच्या मोबाईल फोनवरही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी प्रशासनाकडे धाव घेतली.
हे ही वाचा:
१२ वर्षीय चिमुरडीवर सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या

राम मंदिर चोरी प्रकरणातील टिन्नू यादव अखिलेश यादवांच्या संपर्कात?

दिमित्रोवची जिद्द जिंकली; विंबल्डनमध्ये चौथ्या फेरीत धडक

‘सिया पॉइंट’च्या गर्दीने लोहगड किल्ला धोक्यात; वारसा संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव

बेपत्ता झालेल्या मच्छीमारांमध्ये अप्पलराजू, बंदय्या, गरगय्या, सीतुडू, चिन्ना अम्मोरू, कारी चिन्ना आणि चिन्नय्या यांचा समावेश आहे. यापैकी पाच जण विजयनगरम जिल्ह्यातील भोगापूरम परिसरातील मुक्कम गावचे रहिवासी आहेत, तर एक जण विशाखापट्टणम जिल्ह्यातील भीमुनिपटनम येथील आहे.

पूर्व किनारपट्टी यांत्रिक मासेमारी बोट मालक संघटनेचे अध्यक्ष व्ही. जनकीराम यांनी सांगितले की, ३ जुलै रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यानंतर मत्स्य विभाग, सागरी पोलीस आणि बंदर प्रशासनाने मच्छीमारांशी संपर्क साधून तातडीने किनाऱ्याकडे परतण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी मच्छीमारांनी बोटीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ती अत्यंत संथ गतीने पुढे सरकत असल्याचे सांगितले होते आणि ४ जुलैपर्यंत परत येण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही.

दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी शोधमोहीम आणखी वेगाने राबवण्याचे आदेश देत नौदल, तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच बेपत्ता मच्छीमारांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले आहेत.

सध्या भारतीय नौदलाची हेलिकॉप्टर्स, तटरक्षक दलाची जहाजे आणि सागरी पोलीस समुद्रात युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत आहेत. खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत असले तरी बेपत्ता मच्छीमारांचा शोध सुरू असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version