गेल्या काही दिवसांपासून वक्तव्यांवरून चर्चेत असलेले योगगुरू बाबा रामदेव आणि अभिनेत्री, भाजप खासदार कंगना रणौत यांच्यात अखेर दिलजमाई झाली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाबा रामदेव यांनी कंगना यांच्यासाठी मिठाई आणि भेटवस्तू पाठवत त्यांना ‘बहिण’ संबोधले. त्यांचा हा प्रेमळ पुढाकार कंगना यांनीही स्वीकारला असून त्यांनी बाबा रामदेव यांना ‘मोठा भाऊ’ म्हटले आहे. त्यामुळे काही दिवसांपासून सुरू असलेल्या दोघांमधील शाब्दिक वादावर अखेर पडदा पडल्याचे मानले जात आहे. कंगना यांच्या ‘जनरेशन गटर’ या वक्तव्यावरून हा वाद सुरू झाला होता. त्यावर बाबा रामदेव यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर कंगना यांनीही रामदेव यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिल्याने दोघांमधील शाब्दिक संघर्ष चांगलाच रंगला होता.
हे ही वाचा:
अहमदाबाद बनेल ‘ग्लोबल स्पोर्ट्स हब’! २०३६ ऑलिम्पिकसाठी भारत सज्ज
गिलकडून पडिक्कल-सुथारचं कौतुक-+
पोलिसांचे चालले आहे काय? उबाठा चा ईदचा जुलूस हनुमान मंदिर झाकले…
महिला हॉकी विश्वचषक : नेदरलँड्स- अर्जेंटिनामध्ये रंगणार महामुकाबला
मात्र रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाबा रामदेव यांनी वाद बाजूला ठेवत कंगना यांच्याकडे प्रेमाचा हात पुढे केला. मिठाई आणि भेटवस्तू पाठवून त्यांनी मतभेदांपेक्षा नात्यांना अधिक महत्त्व दिले. देशात वैर आणि द्वेष वाढण्यापेक्षा संवादातून मतभेद दूर केले पाहिजेत, असा संदेशही त्यांच्या भूमिकेतून देण्यात आला. कंगना यांनीही हा पुढाकार सकारात्मकतेने स्वीकारला. रक्षाबंधन हा जुने गैरसमज, चुका आणि मतभेद विसरून नाती अधिक घट्ट करण्याचा सण असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी एकमेकांवर टीका करणारे रामदेव आणि कंगना आता भाऊ-बहीणीच्या नात्याने एकमेकांच्या जवळ आल्याचे चित्र आहे.
सार्वजनिक जीवनात मतभेद होणे स्वाभाविक असले तरी ते वैयक्तिक वैरात बदलू नयेत, याचा संदेश या समेटातून मिळत आहे. सोशल मीडिया आणि सार्वजनिक चर्चेत दोघांच्या वादाची जोरदार चर्चा झाल्यानंतर रक्षाबंधनाच्या निमित्ताने झालेली ही दिलजमाई विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. कंगना यांनी रामदेव यांना मोठा भाऊ मानत त्यांचा प्रेमाचा स्वीकार केल्याने वादाला वेगळेच वळण मिळाले आहे. त्यामुळे आता दोघांमधील जुने मतभेद मागे पडून संबंध पुन्हा सलोख्याचे होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
