घरविशेषअमृत भारत स्टेशन योजना : माणसं नाही, रोबोट करतील अनाउंसमेंट!

अमृत भारत स्टेशन योजना : माणसं नाही, रोबोट करतील अनाउंसमेंट!

बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील पीरपैंती रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत भव्य कायापालट करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून स्टेशनच्या सौंदर्यीकरणाबरोबरच प्रवाशांसाठीच्या सुविधाही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ तीन रोबोटच्या आकृती उभारण्यात आल्या आहेत आणि त्यांच्याद्वारेच रेल्वे अनाउंसमेंट ऐकायला मिळते!

या नव्या रूपात पीरपैंती स्टेशन क्षेत्रातील पर्यटन व इको-पर्यटन स्थळांची झलकही पाहायला मिळते. विक्रमशिला महाविहाराचे भग्नावशेष, गंगा नदीच्या काठावरचे बटेश्वर धाम मंदिर आणि गंगेच्या मध्यभागी असलेल्या तीन टेकड्यांवर वसलेले मंदिर यांचे आकर्षक चित्रण देखील येथे लावले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ८६ जिल्ह्यांमध्ये एकूण १०३ नव्याने विकसित रेल्वे स्थानकांचे वर्च्युअल उद्घाटन करणार आहेत. ही कामगिरी अमृत भारत स्टेशन योजनेचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश भारतीय रेल्वेचे आधुनिकिकरण करणे हा आहे.

हेही वाचा..

“फ्री पॅलेस्टाईन”च्या घोषणा देत इस्रायली दूतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांवर गोळीबार

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ३००० अग्निवीरांनी पाकला दाखवली ताकद!

हमास नेता मोहम्मद सिनवारचा खात्मा? काय म्हणाले पंतप्रधान नेतान्याहू

“प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेणं ही ट्रम्प यांची जुनी सवय…” अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असं का म्हणाले?

पूर्व रेल्वे विभागातील डीआरएम मनीष कुमार गुप्ता यांनी सांगितले की, एनएसजी-५ वर्गात मोडणारे पीरपैंती स्टेशन हा या विभागातील एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात १८.९३ कोटी रुपये खर्चून या स्टेशनचे पुनर्विकासाचे काम सुरू आहे. यामध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, सिग्नलिंग आणि दूरसंचार (एस अँड टी), संकेतफलक, लिफ्ट बसवणे आणि १२ मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिज (एफओबी)सह रूफ प्लाझा तयार करणे यांचा समावेश आहे.

या सर्व बाबींव्यतिरिक्त, स्टेशनच्या कार्यक्षमतेसह दृश्य सौंदर्य वाढवण्यासाठी वेगळे आगमन व प्रस्थान विभाग, पादचारी मार्ग, लक्षवेधी शिल्पाकृती, दर्जेदार अंतर्गत सजावट आणि आकर्षक प्रकाशयोजना असलेले एक आधुनिक प्रांगण उभारण्यात आले आहे. डीआरएम यांनी यासोबतच सांगितले की, स्टेशनचे संपूर्ण डिझाइन व इंटेरिअर हे स्थानिक कला आणि परिसरातील ऐतिहासिक स्मारकांपासून प्रेरित आहे. हे आधुनिक वास्तुरचनाशास्त्र आणि पारंपरिक सांस्कृतिक वारशाचा सुरेख संगम दर्शवते. यामुळे पीरपैंती स्टेशनला एक वेगळीच ओळख प्राप्त झाली आहे, जी बिहारच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडवते. अमृत भारत स्टेशन योजनेचा प्रमुख उद्देश देशभरातील १,३०० पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांना आधुनिक प्रवासी सुविधांनी सज्ज करणे आणि स्थानिक वास्तुकलेशी समरस करून त्यांना आधुनिक वाहतूक केंद्रांमध्ये रूपांतरित करणे हा आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version