घरविशेषछत्तीसगडमध्ये ८ नक्षलवाद्यांना टिपले, चकमक सुरू!

छत्तीसगडमध्ये ८ नक्षलवाद्यांना टिपले, चकमक सुरू!

सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू

छत्तीसगडमधील नारायणपूर-विजापूर-दंतेवाडा या सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये काल (२३ मे) सुरू झालेल्या चकमकीत एकूण आठ नक्षलवादी ठार झाले आहेत.दंतेवाडाचे एसपी गौरव राय यांनी ही माहिती दिली, असे एएनआयच्या हवाल्याने सांगितले.

एसपी गौरव राय यांनी सांगितले की, सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एकूण ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यांसह सुमारे आठ शस्त्रे जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. २१ मे रोजी सकाळी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) ची एक टीम नक्षलविरोधी मोहिमेनंतर परतत असताना ही चकमक सुरु झाली.

हे ही वाचा:

वेदांत अग्रवालचा आक्षेपार्ह भाषेतला व्हिडीओ व्हायरल; जामीन मिळाल्यावर म्हटलं रॅप साँग

‘३७० जागांचा दावा हा अंदाजपंचे आकडा नाही’

मोहाली पोलिसांची दोन ठिकाणी कारवाई, ४.३७ कोटी रुपयांची रोकड जप्त!

वेंगुर्ले बंदरात बोट पलटली, दोघांचा मृत्यू!

गुरुवारच्या चकमकीनंतर, सुरक्षा कर्मचारी त्यांच्या तळावर परतत असताना नक्षलवाद्यांनी एसटीएफच्या गस्ती पथकावर गोळीबार केला आणि शुक्रवारी सकाळी दोन्ही बाजूंमध्ये तोफगोळा झाला, असे पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयच्या हवाल्याने सांगितले.गोळीबार थांबल्यानंतर घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले, असे अधिका-याने सांगितले.याबाबत अधिक तपास सुरु आहे.चकमकीनंतर मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी सुरक्षा दलांचे कौतुक केले आहे.दरम्यान, ताज्या घटनेसह, राज्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत यावर्षी आतापर्यंत ११३ नक्षलवादी ठार झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version