घरराजकारणअमित शहांनी केली काश्मीरमध्ये नव्या युगाची सुरुवात!

अमित शहांनी केली काश्मीरमध्ये नव्या युगाची सुरुवात!

“केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू -काश्मीरमध्ये नवीन युगाची सुरुवात केली आहे.” असे देशाच्या मानवाधिकार संस्थेचे प्रमुख अरुण मिश्रा यांनी आज सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांनी संबोधित केलेल्या कार्यक्रमात न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी असेही म्हटले की आंतरराष्ट्रीय शक्तींनी पोसलेल्या संस्थांकडून भारतावर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप करणे हा “आदर्श” बनला आहे.

राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) २८ व्या स्थापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या बोलताना न्यायमूर्ती मिश्रा म्हणाले, “मिस्टर शहा, तुमच्यासाठीच आता जम्मू -काश्मीरमध्ये एक नवीन युग सुरू झाले आहे. आंतरराष्ट्रीय शक्तींच्या आदेशानुसार भारतावर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप करणे आता प्रघात झाला आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानवी हक्कांसाठी (काही नेत्यांच्या) “निवडक” दृष्टिकोनाबद्दल जोरदार टिप्पणी केली. “काही लोक काही घटनांमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन पाहतात पण इतर घटनांमध्ये नाही. राजकीय चष्म्यातून पाहिल्यावर मानवाधिकारांचे उल्लंघन होते. असे निवडक वर्तन लोकशाहीसाठी हानिकारक आहे.” असं मोदी म्हणाले.

“काही जण मानवाधिकारांच्या नावाखाली देशाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करतात. राजकीय लाभ आणि नुकसानावर नजर ठेऊन मानवाधिकारांकडे पाहणे हे मानवाधिकार तसेच लोकशाहीला हानी पोहोचवते.” असं मोदी पुढे म्हणाले.

हे ही वाचा:

दोन ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांनाही आता मिळणार कोवॅक्सिन

पाकिस्तानी दहशतवाद्याला केली दिल्लीत अटक

जळगावात फुकटसेनेच्या ‘रणरागिणींचा’ भलताच प्रताप

वाहतूक नियम मोडणाऱ्यांना लावणार जबरदस्त ‘ब्रेक’

न्यायमूर्ती मिश्रा यांनी गेल्यावर्षी पंतप्रधान मोदींची स्तुती केली होती. विविध विषयांवरची माहिती असणारे विद्वान नेते, आंतरराष्ट्रीय विषयांवरील माहिती असलेले नेते आणि जमिनीवर राहून काम करणारे नेते अशी स्तुती न्यायमूर्ती मिश्रा यांनी केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version