घरबिजनेसठेवीदारांचे पैसे बँकांमध्ये सुरक्षित

ठेवीदारांचे पैसे बँकांमध्ये सुरक्षित

खासगीकरणापूर्वी मोदींचे आश्वासन

तुम्ही बँकांमध्ये जमा केलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घोषणा केली की रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधाखाली असलेल्या बँकांमध्ये खाते असलेल्या तीन लाख ठेवीदारांना लवकरच ५ लाख रुपयांची सुधारित विमा रक्कम मिळेल.

“आरबीआयच्या निर्बंधाखाली असलेल्या १६ नागरी सहकारी बँकांकडून १ लाखाहून अधिक ठेवीदारांना १,३०० कोटी रुपये मिळाले आहेत.” असे पंतप्रधानांनी “ठेवीदार फर्स्ट: गॅरंटीड टाइम-बाउंड डिपॉझिट इन्शुरन्स पेमेंट रु.५ लाख”.

दोन सरकारी बँकांच्या खाजगीकरणासाठी सरकारच्या प्रस्तावित विधेयकाविरोधात १६ आणि १७ डिसेंबर रोजी बँकांच्या दोन दिवसीय देशव्यापी संपापूर्वी पंतप्रधान बोलत होते.

बँकिंग कायदे (सुधारणा) विधेयक, २०२१, जे दोन सरकारी बँकांचे खाजगीकरण सुलभ करेल. यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांचा समावेश आहे. हे २६ कायद्यांचा भाग आहे ज्यांना सरकार चालू हिवाळी अधिवेशनात मंजूर करू इच्छित आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल

मुंबई महापालिकेत वाहते भ्रष्टाचाराची गटारगंगा

…म्हणून पंतप्रधान मोदींचे ट्विटर खाते हॅक झाले?

‘म्हाडा’ ची भरती परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींचा संताप

गेल्या अधिवेशनात, संसदेने सरकारी सामान्य विमा कंपन्यांचे खाजगीकरण सक्षम करण्यासाठी सामान्य विमा व्यवसाय (राष्ट्रीयकरण) सुधारणा विधेयक, २०२१ मंजूर केले होते.

बँकिंग व्यवस्थेवर विश्वास निर्माण व्हावा म्हणून ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी “एका मजबूत उपक्रमाची सुरुवात” ठळकपणे मांडण्याचे आवाहन पंतप्रधानांनी माध्यमांना केले. “प्रसारमाध्यमांनी ज्याप्रमाणे स्वच्छ भारत कार्यक्रमावर प्रकाश टाकला होता, त्याचप्रमाणे ठेवीदारांचे पैसे सुरक्षित आहेत हे ठळकपणे सांगायला हवे.” असे ते म्हणाले. “मोदी म्हणत आहेत म्हणून नाही तर ठेवीदारांनी बँकिंग व्यवस्थेवर विश्वास ठेवण्याची गरज आहे म्हणून.” असं त्यांनी सांगितलं.

पंतप्रधानांनी घोषित केले की “न्यू इंडिया” मध्ये, अशा समस्या झाकल्या जाणार नाहीत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version