घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानराऊतांची तर रोजच होळी, तीच बोंब तीच भांग

राऊतांची तर रोजच होळी, तीच बोंब तीच भांग

संजय राऊत आणि बेताळ वक्तव्यं यांची सर्वांना आता सवयच झाली आहे. सकाळ होणार, मीडिया येणार, त्यांच्यासमोर घड्याळ काका येणार, काही तरी बरळणार हे आता सर्वांना तोंडपाठ झालंय. ते काहीही बोलू शकतात, शिवीगाळ करू शकतात. न्यायव्यवस्थेविषयी बोलू शकतात. निवडणूक आयोगाला शिव्या देऊ शकतात. कारण ते स्वयंभू आहेत. कालच होळी झाली. होळीविषयी संजय राऊत बोलणार नाहीत असं कसं होईल. महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आलं आहे हे सगळ्यांना माहित आहे. आम्ही शुद्धीत आहोत. या लोकांची भांग उतरली की हे सरकार जाईल, असं वक्तव्य आणि भाकित संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केलं आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version