घरविशेषसंसदेच्या दारात खडाजंगी! दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब

संसदेच्या दारात खडाजंगी! दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब

संसदेत चौथ्या दिवशीही राजकीय संघर्ष शिगेला

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी संसद भवन परिसरात एनडीए आणि विरोधी पक्ष आमनेसामने आले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात निदर्शने केली. इंडि आघाडीच्या खासदारांसमोर एनडीएचे खासदारही आले. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरू झाली. २१ जुलै रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनाचा एनडीएचे खासदार निषेध करत आहेत.

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी इंडि आघाडीने केली आहे. आंदोलनादरम्यान प्रियांका गांधी एनडीएच्या खासदारांच्या अगदी जवळ गेल्या, परंतु सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून त्यांना रोखले. संसदेच्या आतही हा गदारोळ सुरूच होता, ज्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दुपारी 2 वाजता लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर प्रचंड गदारोळ झाला, ज्यामुळे शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

हे ही वाचा:

राहुल गांधींचे आंदोलन प्रामाणिक नव्हते, त्यांनी जंतरमंतरवर बसायला हवं होतं!

अनाहतची विजयी मुसंडी; क्वार्टर फायनलमध्ये धडक

शुम्बा बाहेर, झिम्बाब्वेची ताकद कमी!

कंगाल पाकिस्तानची अमेरिकेकडे भीख!

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिल्यासच आम्ही चर्चेसाठी तयार असू.” राज्यसभेचे कामकाजही सकाळी 11 वाजता गोंधळाच्या वातावरणात सुरू झाले. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “पंतप्रधानांचे आजचे वक्तव्य प्रक्षोभक आहे. शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तरच आम्ही चर्चेसाठी तयार होऊ.”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version