घरविशेषभगवान जगन्नाथा जिंकव रे बाबा!

भगवान जगन्नाथा जिंकव रे बाबा!

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी–वीस सामन्यांच्या मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पुरी येथील श्रीजगन्नाथ धामात जाऊन भगवान जगन्नाथांचे दर्शन घेतले.

कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यासोबतच युवा खेळाडू तिलक वर्मा, फील्डिंग कोच टी. दिलीप, बॅटिंग कोच सीतांशु कोटक आणि सपोर्ट स्टाफमधील इतर सदस्यांनीही भगवान जगन्नाथाचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केला. सूर्यकुमार यादव यांची पत्नी देविशा शेट्टीदेखील मंदिरात उपस्थित होत्या.

पुरी जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनचे सचिव रबी शंकर प्रतिहारी म्हणाले, “टीमला भगवानचा आशीर्वाद मिळणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. टीम इंडिया नक्कीच यशस्वी होईल. टीम मॅनेजर, कोच, कर्णधार आणि इतर खेळाडूंनी येथे दर्शन घेतले. खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते जमा झाले होते, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली.”

पुरीचे एसपी प्रतीक गीता सिंह म्हणाले, “टीम इंडियाचे कर्णधार, कोच आणि इतर सदस्य येथे आले होते. त्यांच्या हालचालीच्या योजनेनुसार आम्ही सर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केल्या होत्या. मार्गातील सर्व पोलीस ठाण्यांना आधीच सूचना देण्यात आल्या होत्या. मंदिर परिसरात अतिरिक्त सुरक्षा तैनात केली होती. त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र रिंग–राउंड टीम तयार करण्यात आली होती.”

भारत आणि दक्षिण आफ्रिका टी–वीस विश्वचषक दोन हजार चोवीसच्या अंतिम सामन्यानंतर प्रथमच या फॉर्मॅटमध्ये एकमेकांसमोर खेळणार आहेत. दक्षिण आफ्रिकेने या भारतीय दौर्‍यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारताला शून्य–दोनने पराभूत केले. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका दोन–एकने हारली असली तरी त्यांनी भारताला चांगली टक्कर दिली होती. त्यामुळे टी–वीस मालिका अत्यंत रोमांचक होण्याची दाट शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version