घरधर्म संस्कृतीमुघलांच्या फौजेला साहिबजादे निर्भयपणे सामोरे गेले! त्यांच्या चरणी नतमस्तक

मुघलांच्या फौजेला साहिबजादे निर्भयपणे सामोरे गेले! त्यांच्या चरणी नतमस्तक

वीर बालदिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन

नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आयोजित केलेल्या वीर बालदिवस कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. भविष्यात भारताला यशाच्या शिखरावर घेऊन जायचे असेल तर भूतकाळातील संकुचित विचारांपासून मुक्त व्हावे लागेल. त्यामुळेचं स्वातंत्र्याच्या ‘अमृत काल’मध्ये देशाने ‘गुलामीच्या मानसिकतेतून मुक्ती’चा श्वास घेतला आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

पीएम मोदी म्हणाले, “मी वीर साहिबजादांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून घोषित करण्याची संधी मिळाली, हे माझ्या सरकारचे सौभाग्य आहे. पण हेही खरे आहे की चमकौर आणि सरहिंदच्या युद्धात जे काही झाले ते ‘भूतो न भविष्यति’ होते. एकीकडे धार्मिक कट्टरतेने आंधळी झालेली एवढी मोठी मुघल सल्तनत, तर दुसरीकडे ज्ञान आणि तपश्चर्येत तल्लीन झालेले आमचे गुरु, भारताची प्राचीन मानवी मूल्ये जगण्याची परंपरा!” एकीकडे दहशतीचा कळस, तर दुसरीकडे अध्यात्माचे शिखर! एकीकडे धार्मिक उन्माद आणि दुसरीकडे प्रत्येकामध्ये देव पाहणारा औदार्य! या सगळ्यात एका बाजूला लाखोंची फौज, तर दुसरीकडे गुरूंचे शूर साहिबजादे एकटे असतानाही निर्भयपणे उभे होते! हे शूर साहिबजादे कोणाच्याही धमकीला घाबरले नाहीत, कोणापुढे झुकले नाहीत.

पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, त्या युगाची कल्पना करा! औरंगजेबाच्या दहशतीविरुद्ध, भारताला बदलण्याच्या त्याच्या योजनांविरुद्ध, गुरु गोविंद सिंहजी पहाडासारखे उभे राहिले. पण, जोरावर सिंग साहब आणि फतेह सिंग साहब यांसारख्या लहान मुलांशी औरंगजेब आणि त्याच्या राजवटीचे काय वैर असू शकते? दोन निष्पाप मुलांना जिवंत भिंतीत लटकवण्यासारखे क्रौर्य का केले गेले? कारण औरंगजेब आणि त्याच्या लोकांना तलवारीच्या जोरावर गुरु गोविंद सिंग यांच्या मुलांचा धर्म बदलायचा होता. पण, भारताचा तो सुपुत्र, तो शूर मुलगा मृत्यूलाही घाबरला नाही. ते भिंतीमध्ये जिवंत गाडले गेले पण त्यांनी त्या दहशतवादी योजनांना कायमचे गाडून टाकले.

हे ही वाचा:

सुनील गावस्कर यांच्या मातोश्रींचे निधन

संजय राऊत यांचे योगदान आणि प्रतिकांची चोरी

त्या जुन्या व्हीडिओंचे हिशेब अंधारेबाई देतील काय?

संजय राऊत यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान काय?

 

पंतप्रधान म्हणाले, “साहिबजादांनी एवढा मोठा त्याग आणि बलिदान दिले, प्राण अर्पण केले, पण ही एवढी महान ‘शौर्य गाथा’ विस्मरणात गेली आहे. .” पण आता ‘नवीन ‘ दशकांपूर्वी झालेली जुनी चूक सुधारत आहे. स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’मध्ये देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पुन्हा जिवंत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्वातंत्र्यसैनिक, वीरपत्नी आणि आदिवासी समाजाचे योगदान जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही काम करत आहोत याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version