वैचारिक, राजकीय भूमिकेप्रमाणे आपण टीका करायला मोकळे असतो. मात्र ज्यावेळी परिस्थिती ही संकटाची असते, आपत्तीची असते तेव्हा मात्र सहानुभूती, हळहळ या माध्यमातूनच आपण विचार मांडू शकतो. तिथे टिंगलटवाळी चालत नाही, ते संस्कारात बसत नाही. पण नेपाळमधील महाभयंकर घटनेनंतर आपल्या राजकारणासाठी त्याचा वापर गिरीश कुबेर यांनी केला.
