घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणसात महीने खदखदणारे मस्साजोग कांड, निर्णायक वळणावर...

सात महीने खदखदणारे मस्साजोग कांड, निर्णायक वळणावर…

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर फरार झालेला वाल्मिक कराड आज पोलिसांना शरण आला. राष्ट्रवादी शपचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कराडच्या विरोधात फक्त खंडणीचा गुन्हा का? अजून हत्येचा गुन्हा दाखल का करण्यात आलेला नाही, असा सवाल केला आहे. आव्हाडांना फक्त मारहाणीचा अनुभव आहे, त्यांना तपासाचा अनुभव नसल्याने ते असे बिनबुडाचे सवाल विचारतायत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कराडला अजून सह आरोपी करण्यात आले नसले तरी त्याच्या विरोधात आवादा एनर्जी प्रा.लि. या कंपनीकडून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच खंडणी प्रकरणाचे पर्यवसान पुढे संतोष देशमुख हत्या प्रकरणात झाले असल्याची शक्यता आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version