घरविशेषहिंसक आंदोलकांविरोधात दिल्लीतील नागरिक रस्त्यावर!

हिंसक आंदोलकांविरोधात दिल्लीतील नागरिक रस्त्यावर!

२६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत घडलेल्या हिंसाचाराची साऱ्या देशभर निंदा होत असताना आता दिल्लीतील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी नागरिक एकवटले आहेत. या सोबतच दिल्लीची सिंघू सीमा खाली करण्यात यावी अशी मागणी या नागरिकांनी केली आहे. दोन महिन्यापासून आपल्या परिसरात सुरु असलेले आंदोलन सहन करणाऱ्या नागरिकांचाही आता संयम संपल्याचे या घटनेतून दिसून येत आहे.

केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक काळ दिल्लीत आंदोलन सुरु आहे. हे आंदोलक दिल्लीच्या विविध सीमांवर ठिय्या देऊन बसले आहेत. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली आयोजित केली गेली पण या रॅलीच्या नावाखाली धुडगूस घालून हिंसेचा नंगानाच करण्यात आला. साऱ्या देशातून या हिंसेविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असतानाच आता दिल्लीतील सिंघू सीमेच्या परिसरात राहणारे स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरले आहेत. “तिरंगे का अपमान नही सहेगा हिंदुस्तान” अशा घोषणा देत हे नागरिक हिंसाचाराच्या विरोधात एकवटले आहेत. सिंघू सीमेवर एकवटलेल्या आंदोलकांनी सीमा खाली करावी अशीही मागणी या नागरिकांनी केली आहे.

सिंघू सीमेवरील नागरिक रस्त्यावर उतरल्यामुळे आता तिथे आंदोलन विरुद्ध प्रतिआंदोलन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version