घरविशेषजगापेक्षा पाकिस्तानात जास्त दहशतवादी!

जगापेक्षा पाकिस्तानात जास्त दहशतवादी!

गुलाम नबी आझाद यांचे बहरीनमध्ये विधान

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी पाकिस्तानबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, जगातील सर्व देशांपेक्षा जास्त दहशतवादी एकट्या पाकिस्तानमध्ये आहेत. बहरीनच्या भेटीदरम्यान आझाद म्हणाले की, भारतात एकता आहे, तर पाकिस्तान दुभंगलेला आहे.

भाजप खासदार बैजयंत जय पांडा यांच्या नेतृत्वाखाली बहरीनला पोहोचलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा भाग असलेले गुलाम नबी आझाद यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, “बहरीन हे लहान भारतासारखे दिसते हे पाहून मला आनंद झाला. येथे प्रत्येक धर्माचे लोक राहतात. येथे कोणतेही बंधन नाही. आम्ही भारतातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी संबंधित असू शकतो, परंतु येथे आम्ही भारतीय म्हणून आलो आहोत.

ते पुढे म्हणाले, पाकिस्तान धर्माच्या नावाखाली निर्माण झाला होता, परंतु तो एकसंध राहू शकला नाही. पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) आणि पश्चिम पाकिस्तान देखील टिकू शकले नाहीत. भारतात प्रत्येक धर्माचे लोक शांती आणि बंधुत्वाने एकत्र राहतात.

सर्वपक्षीय शिष्टमंडळाने बहरीनमध्ये उपस्थित असलेल्या मोठ्या भारतीय समुदायाची भेट घेतली. यावेळी शेजारील देशांशी चांगले संबंध निर्माण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांचे आझाद यांनी कौतुक केले. “आम्हाला भारतीय समुदायाला भेटून आनंद झाला, ते मोठ्या संख्येने आले होते. कोणतेही सरकार असो, आमच्या सर्व पंतप्रधानांनी नेहमीच पाकिस्तानसह आमच्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु प्रत्येक वेळी भारताला दहशतवादाचा सामना करावा लागला आहे”, असे ते म्हणाले.

हे ही वाचा : 

भारतापासून पाकिस्तानला वाचवल्याबद्दल शेहबाज शरीफ यांनी एर्दोगान यांचे मानले आभार!

‘ऑपरेशन सिंदूरनंतर’ पंतप्रधान मोदींचा गुजरातमध्ये रोड शो

मुंबईत मुसळधार पाऊस, रस्ते पाण्याखाली, विमान आणि लोकल गाड्यांवर परिणाम!

‘हे’ अस्त्र न लढता विजय मिळवून देईल.

ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना आझाद म्हणाले, ही कारवाई पाकिस्तानातील सामान्य नागरिकांविरुद्ध नाही तर तिथे असलेल्या दहशतवादी पायाभूत सुविधांविरुद्ध होती. ते पुढे म्हणाले, “आमच्या सैन्याने कोणत्याही सामान्य पाकिस्तानी नागरिकाचे नुकसान होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली होती. कारवाईत फक्त दहशतवादी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य मारले गेले. पण दुर्दैवाने पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून आमच्या सामान्य नागरिकांना लक्ष्य केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version