घरबिजनेसदेशाचे पाऊल लवकरच ५ जी मोबाईल युगाकडे

देशाचे पाऊल लवकरच ५ जी मोबाईल युगाकडे

 आपण ५ जी च्या युगाकडे पाऊल टाकत आहोत. आता जास्त वेळ थांबावे लागणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत

आपण ५ जी च्या युगाकडे पाऊल टाकत आहोत. आता जास्त वेळ थांबावे लागणार नाही. दहापट वेगवान गती असलेली ५ जी माेबाइल टेलिफाेनी सेवा देशात लवकरच सुरू हाेणार आहे. आम्ही प्रत्येक गावात ऑप्टिकल फायबर घेऊन जात आहोत. डिजिटल इंडियाचे स्वप्न गावागावांतून जाईल याची मला पूर्ण माहिती आहे असे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मार्गदर्शन करताना सांगितले.

यूपीआ य भीम, डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून इनाेव्हेशनची ताकद अनुभवता येत असल्याचं सांगून पंतप्रधान माेदी म्हणाले की, डिजिटल इंडिया चळवळीच्या माध्यमातून आता सरकार ५ जी, सेमीकंडक्टरच्या दिशेने पाऊल टाकत आहे, ऑप्टिकल फायबरचे जाळे विस्तारत आहे. हे केवळ आधुनिकीकरणाचे लक्षण नाही तर त्यात तीन मोठ्या शक्ती अंतर्भूत आहेत असेही ते म्हणाले. देशात ४ लाख काॅमन सर्व्हिस सेंटर्स विकसित हाेत आहेत. चार लाख डिजिटल उद्याेजक खेड्यापाड्यात तयार हाेत आ हेत. खेड्यातील लाेक त्यांच्याकडून सेवा घेण्याची सवय लावून घेऊ शकतात ही देशाची अभिमानाची गाेष्ट आहे असेही माेदी म्हणाले.

हे ही वाचा:

७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलकडून खास डूडल

बोलण्यातून, वागण्यातून महिलांचा अपमान करू नका

गांधीजी, डॉ. आंबेडकर, सावरकर, सुभाषबाबूंचा त्याग विसरता येणार नाही

गुलामीचा अंश मिटवूया; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिले पाच संकल्प

ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी हाेण्याची गरज

मोदी म्हणाले की, अटल इनोव्हेशन मिशन, इनक्युबिशन सेंटर्स आणि देशातील स्टार्टअप नवीन क्षेत्रे विकसित करत आहेत, ज्यामुळे देशातील तरुणांसाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत. मिशन हायड्रोजन ते दत्तक घेण्यासाठी सौरऊर्जेचा अवलंब करून ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्याचे आवाहन त्यांनी केले. “ऊर्जा स्वातंत्र्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना आपण या उपक्रमांना पुढील स्तरावर नेण्याची गरज आहे,” मोदी म्हणाले.

भारती एअरटेलची ५ जी सेवा या महिन्यात

भारती एअरटेल या महिन्यात ५ जी सेवा सुरू करणार असून मार्च २०२४ पर्यंत देशातील सर्व शहरे आणि प्रमुख ग्रामीण भागांपर्यत पाेहचेल. जिओ या देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनीने अव्वल १,००० शहरांमध्ये ५जी सेवेचं नियोजन पूर्ण केले आहे. सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या जिओ, सुनील मित्तल यांच्या नेतृत्वाखालील भारती एअरटेल, सर्वात श्रीमंत भारतीय गौतम अदानी यांचा समूह आणि व्होडाफोन आयडिया यांना ५ जी टेलिकॉम स्पेक्ट्रम १.५ लाख कोटी रुपयांना विक्री केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version