घरक्राईमनामाअतिक हत्याकांडाचा एसआयटी तपास करणार

अतिक हत्याकांडाचा एसआयटी तपास करणार

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा निर्णय

सीएम योगी यांनी अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. पहिल्या तपासासाठी तीन सदस्यीय न्यायिक चौकशी आयोग स्थापन करण्यात आला होता. मात्र आता तीन सदस्यीय एसआयटी पथक हत्येचा तपास करणार आहे. तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एडीजी प्रयागराज भानू भास्कर या पथकाचे नेतृत्व करणार आहेत. या पथकात सहायक पोलिस आयुक्त, अतिरिक्त पोलीस उपमहासंचालक आणि निरीक्षक यांचा समावेश असेल.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अरविंद कुमार त्रिपाठी द्वितीय यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर आयोगाला दोन महिन्यांत आपला अहवाल सरकारला सादर करावा लागणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिक अहमद आणि अश्रफ यांच्या खळबळजनक हत्येच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. सोबतच याबाबत त्रिसदस्यीय न्यायिक चौकशी आयोग स्थापन करून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, असेही सांगण्यात आले होते.

शनिवारी माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांना प्रयागराजमधील कोल्विन हॉस्पिटलमध्ये चौकशीसाठी नेण्यात आले होते. दरम्यान, दोन्ही माफिया बंधू माध्यमांशी बोलत होते. त्याचवेळी तीन हल्लेखोरांनी पत्रकारांच्या वेशात येऊन माफिया बांधवांवर गोळीबार करून त्यांना ठार मारले. यानंतर या हल्लेखोरांची कुंडली काढली असता, आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे या आरोपींचा कुटुंबाशी काहीही संबंध नाही. मात्र, या घटनेनंतर तिन्ही हल्लेखोरांनी आत्मसमर्पण केले. त्याला सध्या १४ दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे.

हे ही वाचा:

प्रवाशांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या शारुख सैफी विरोधात युएपीए अंतर्गत होणार कारवाई

पायधुनीत तलवार गँगचा धूमाकूळ, दुकानात नाचविल्या नंग्या तलवारी

महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्याला गालबोट, उष्माघातामुळे १० जणांचा मृत्यू

रत्नागिरी बस स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी की त्रासासाठी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पंच कालिदास मार्गावरील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची किंवा मुख्यमंत्र्यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याची खात्री होईपर्यंत अशा बातम्या देऊ नयेत, असेही सांगण्यात आले आहे..

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version