घरदेश दुनियाबलुचिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद

बलुचिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद

शाळा, वाहतूक सेवांवरही निर्बंध

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ३६ जिल्ह्यांमध्ये १६ नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. प्रांतिक गृह विभागाने सुरक्षा कारणास्तव या सेवा तात्पुरत्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे, तर सलग पाचव्या दिवशी ‘जाफर एक्सप्रेस’ रेल्वे सेवा देखील बंद राहिली. ही ट्रेन क्वेटा ते पेशावर दरम्यान धावते. राष्ट्रीय महामार्ग N-७० च्या लोरलाई विभागावर देखील १४ नोव्हेंबरपर्यंत वाहतूक सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत.

गृह विभागाने सांगितले की, १२ ते १६ नोव्हेंबर या कालावधीसाठी सुरक्षा इशारा जारी करण्यात आला असून विद्यमान परिस्थिती पाहता या सेवा निलंबित राहतील. स्थानिक माध्यमांनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले की, “संपूर्ण प्रांतातील ग्रामीण भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद राहील, मात्र क्वेटा जिल्हा या निर्बंधातून वगळला आहे.” क्वेटाला जरी सवलत देण्यात आली असली, तरी नागरिकांनी तक्रार केली की शहरातील अनेक भागांमध्ये नेटवर्क बंद असून, त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा..

जैसलमेरच्या वाळवंटात लष्कराचे सामरिक सामर्थ्य प्रदर्शन

माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलाची किती मालमत्ता ईडीने केली जप्त?

छत्तीसगडमध्ये चकमकीत सहा माओवादी ठार

फिलिपिन्समध्ये क्षयरोगाविरोधात मोहीम

प्रांतिक सरकारने सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या कारणास्तव १४ नोव्हेंबर पर्यंत राष्ट्रीय महामार्ग N-७० च्या लोरलाई विभागात टॅक्सी आणि खाजगी वाहनांसह सर्व वाहतूक सेवांवर तात्पुरता बंदी आदेश जारी केला आहे. दरम्यान, बुधवारी क्वेटाच्या छावणी क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था बंद राहिल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव १२ ते १६ नोव्हेंबर या काळात शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात येतील. पाकिस्तान रेल्वेच्या मते, क्वेटा ते पेशावर धावणारी जाफर एक्सप्रेस सलग पाचव्या दिवशीही स्थगित राहिली. रेल्वे प्रशासनाने पुष्टी केली की सेवा १३ नोव्हेंबर (गुरुवार)पर्यंत बंद राहील, मात्र ही मुदत पुढे वाढवली जाऊ शकते.

याशिवाय, कराचीला जाणारी बोलन मेल सेवादेखील बंद करण्यात आली आहे. हम न्यूजच्या माहितीनुसार, रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, “बलुचिस्तानहून इतर प्रांतांकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या कार्यकारी आणि सुरक्षा कारणांमुळे तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत.” अधिकाऱ्यांनी रेल्वे किंवा इंटरनेट सेवा पुन्हा सुरु होण्याची कोणतीही निश्चित वेळ जाहीर केलेली नाही, मात्र त्यांनी स्पष्ट केले की हे सर्व निर्णय “जनतेची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी” घेतले गेले आहेत.

दुनिया न्यूजच्या माहितीनुसार, बलुचिस्तान सरकारने संभाव्य दहशतवादी धोके लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय प्रदेशातील दहशतवादी हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर सुरक्षा उपाययोजनांचा एक भाग आहे. अलिकडच्या काही महिन्यांमध्ये बलुचिस्तानमधील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. सामान्य नागरिकांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना प्रबळ झाली आहे. त्याचबरोबर, इंटरनेट सेवांवरील बंदीमुळे आर्थिकदृष्ट्याही सरकारला मोठा फटका बसला आहे. जानेवारी २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, मागील वर्षी इंटरनेट आणि सोशल मीडिया अ‍ॅप्स बंद केल्यामुळे सर्वाधिक आर्थिक नुकसान सोसणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तान प्रथम क्रमांकावर होता. डॉनने दिलेल्या माहितीनुसार, देशाला या बंदीमुळे तब्बल १.६२ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version