घरविशेष१३ बांगलादेशी नागरिकांना पकडले

१३ बांगलादेशी नागरिकांना पकडले

छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यात १३ बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सर्वांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असून त्यांना लवकरच देशाबाहेर हाकलण्याची (डिपोर्ट) प्रक्रिया सुरू केली जात आहे. यासंदर्भात छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी सांगितले की, या बेकायदेशीर घुसखोरीविरोधात विशेष टास्क फोर्स (STF) सतत सक्रिय आहे. उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी सांगितले की, घुसखोरांविरोधात कारवाईसाठी STF ची स्थापना करण्यात आली असून नागरिकांना अशा प्रकारच्या हालचालींबद्दल माहिती देण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांक देखील जाहीर करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी छापे टाकून या घुसखोरांची ओळख पटवली जात आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे.

माध्यमांशी बोलताना, विजय शर्मा यांनी नक्षलवाद्यांच्या दाव्यांवरही प्रतिक्रिया दिली. नक्षलवाद्यांनी एका पत्राद्वारे दावा केला आहे की, गेल्या वर्षभरात ३०० हून अधिक नक्षलवादी ठार झाले आहेत. यावर विजय शर्मा म्हणाले, “हा काही गंभीर विषय नाही, कारण त्यांच्या सहकाऱ्यांच्या अटकेची संख्या याहून खूप जास्त आहे. मुद्दा केवळ मृत्यूंचा नाही, तर शरण येणाऱ्या व अटकेत घेतलेल्या नक्षलवाद्यांची संख्या जवळपास ३,००० पर्यंत पोहोचली आहे.”

हेही वाचा..

“जडेजा लढला, भारत हरला; गिलने दिली शाबासकी”

२७ धावांत संपली वेस्ट इंडीजची कहाणी

युक्रेन युद्ध संपवा अन्यथा १०० टक्के कर आकारणीला सामोरे जा!

टेस्ला भारतीय बाजारात प्रवेश करण्यास सज्ज

बीजापूर जिल्ह्यात झालेल्या आयईडी स्फोटावरही उपमुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, आयईडी (IED) हे आता सर्वांत मोठं आव्हान बनलं आहे. यात केवळ ग्रामीणच नव्हे तर सुरक्षा दलांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. ते म्हणाले, “आयईडी शोधण्याची व निष्क्रिय करण्याची प्रक्रिया अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, जेणेकरून या धोक्याला आळा घालता येईल. अलीकडेच नक्षलवाद्यांनी बीजापूरमध्ये आयईडी स्फोट घडवून आणला होता, ज्यामध्ये काही ग्रामस्थ जखमी झाले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version