घरविशेषसेना प्रमुखांनी युवकांना दिले महत्वाचे धडे

सेना प्रमुखांनी युवकांना दिले महत्वाचे धडे

- Advertisement -

भारतीय सैन्याचे प्रमुख जनरल उपेन्द्र द्विवेदी यांनी युवकांना ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेला सर्वोच्च स्थान देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी तरुणांना प्रेरित करताना सांगितले की, ते शिस्तबद्ध, आत्मविश्वासी आणि उद्देशपूर्ण नागरिक बनावेत आणि नेहमी ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना मनामध्ये जोपासावी. जनरल द्विवेदी यांनी युवकांना असे नागरिक होण्यासाठी प्रोत्साहित केले जे ‘राष्ट्र प्रथम’ या आदर्शासाठी पूर्णतः समर्पित असतील. त्यांनी मध्यप्रदेशातील सतना आणि रीवा परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

दोन दिवसांच्या प्रवासादरम्यान त्यांनी सतना येथील सरस्वती शिशु मंदिर, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, तसेच रीवा येथील ठाकूर राणमत सिंह कॉलेज आणि श्याम शाह मेडिकल कॉलेजला भेट दिली. या संस्थांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी संवाद साधला. आपल्या प्रेरणादायी भाषणात जनरल द्विवेदी म्हणाले, “मोठं स्वप्न पाहा, कठोर परिश्रम करा आणि आपल्या संस्कारांची व नैतिक मूल्यांची मुळे मजबूत ठेवा. खरी यशस्वीता ही चारित्र्य, करुणा आणि बांधिलकीतूनच मिळते.”

हेही वाचा..

वारकरी संप्रदायाचे कार्य देशभरात पोहोचवणारे संतश्रेष्ठ नामदेव

देशविरोधी, सनातन विरोधी शक्ती स्वार्थी हेतूने आरएसएसला विरोध करतात!

‘इंग्रजी सण हॅलोविन साजरा’; भाजपाने लालू यादवांना महाकुंभ ‘फालतू’ची आठवण करून दिली!

आयुष्मान कार्ड साखळीचा पर्दाफाश; ३०० हून अधिक ओळखपत्रे जप्त!

सेना प्रमुखांनी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही संबोधित केले. त्यांनी सांगितले की, सैनिक आणि डॉक्टर या दोघांचंही ध्येय सारखं आहे. दोघेही जीव वाचवतात. दोघांचं लक्ष्य कौशल्य आणि करुणेने सेवा करणं हेच आहे. त्यांनी वैद्यकीय समुदायाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हटले की, डॉक्टर राष्ट्राची अमूल्य सेवा करत आहेत आणि त्यांच्या योगदानामुळे देश अधिक सक्षम बनतो. जनरल द्विवेदी यांनी युवकांना सतत शिकत राहण्याचे, आव्हानांपुढे खंबीर उभं राहण्याचे आणि देशाच्या प्रगतीत अभिमानाने योगदान देण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, युवा पिढी ही ‘विकसित भारत २०४७ ची मशाल वाहणारी आहे.

सेना प्रमुख म्हणाले की, भारताची खरी ताकद ही युवकांच्या ऊर्जा, नवोन्मेष आणि प्रामाणिकपणात दडलेली आहे. आपल्या संदेशाच्या शेवटी त्यांनी सांगितले , मोठी स्वप्ने बघा, विनम्र राहा आणि अभिमानाने राष्ट्रसेवा करा. उत्साही विद्यार्थ्यांसाठी सेना प्रमुखांचा हा दौरा केवळ प्रेरणादायी ठरला नाही, तर राष्ट्रनिर्माणातील त्यांच्या भूमिकेबद्दल एक नवीन चेतना निर्माण करणारा ठरला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version