घरविशेषजो हारा वोही सिकंदर; मुनीरना बढती, बनले फिल्ड मार्शल

जो हारा वोही सिकंदर; मुनीरना बढती, बनले फिल्ड मार्शल

भारताविरुद्ध पराभवानंतरही बक्षिसी

ही जादूच असावी, अन्यथा याचे स्पष्टीकरण काय? काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या लष्कराला भारताकडून मोठा पराभव पत्करावा लागला असताना, लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांना फील्ड मार्शल म्हणून पदोन्नती देण्यात आली. ही नेमणूक जितकी प्रतीकात्मक आहे, तितकीच बोलकी आहे.

पाकिस्तानसारख्या विरोधाभासांनी भरलेल्या देशात असे प्रकार काही नवीन नाहीत – हेच एक चमत्कार वाटावे. मुनीर यांच्या तथाकथित “धोरणात्मक आणि धाडसी नेतृत्वाखाली पाकिस्तानने भारतावर विजय मिळवला” या खोट्या कथनाच्या आधारे, रावळपिंडी-इस्लामाबादच्या संयुक्त सत्तेचा गट स्वतःचे कौतुक करत आहे. ही पदोन्नती ही त्या भ्रमाची साक्ष आहे.

पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखालील पाकिस्तानच्या फेडरल मंत्रिमंडळाने मंगळवारी मुनीर यांना  देशाच्या सुरक्षेसाठी आणि शत्रूवर विजय मिळवल्याबद्दल फील्ड मार्शलपदी बढती दिली.

“जनरल सय्यद आसिम मुनीर यांनी स्वतःलाच फील्ड मार्शल पद बहाल केले,” असे यूकेतील सोशल मीडियात इम्तियाज महमूद यांनी ‘X’ वर लिहुन या बातमीची खिल्ली उडवली आहे.

तज्ज्ञांनीही म्हटले की, ही बढती स्वतः मुनीर यांच्या आदेशावरच झाली आणि अनेक दशकांपासून निष्क्रिय असलेले फील्ड मार्शल पद पुन्हा सक्रिय करण्यात आले. याआधी फक्त अयूब खान यांना १९६५ मध्ये भारत-पाक युद्धादरम्यान फील्ड मार्शल पद देण्यात आले होते.

“मुनीर यांना फील्ड मार्शल बनवणे म्हणजे पाकिस्तानच्या नागरी प्रशासनाच्या कमकुवतपणाचे प्रतीक आहे,” असं माजी मेजर माणिक एम. जोली यांनी म्हटलं. मुनीर यांची पदोन्नती ही त्यांच्या सामर्थ्य संकलनाचा भाग असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुनीर यांना “पाकिस्तानचे तारणहार” म्हणून पेश करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. विशेषतः २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यापूर्वी त्यांच्या हिंदूविरोधी आणि भारतविरोधी भाषणादरम्यान हे स्पष्ट दिसले.

पाकिस्तानच्या ऑपरेशन ‘Bunyan al-Marsoos’ आणि त्यांच्या विजयाच्या दाव्यांमध्ये मोठा विरोधाभास आहे.

भारताचे ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम हल्ल्याला ठोस आणि अचूक उत्तर होते. बहावलपूर आणि मुरिदके यांसह ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले, सुमारे १०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला. भारताने जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तैयबा या पाकिस्तानने आश्रय दिलेल्या संघटनांवर हल्ले केले. पाकिस्तानच्या प्रतिहल्ल्यात भारताने अधिक जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे निष्क्रिय करण्यात आली.

हे ही वाचा:

आजा पाकिस्तानी, बाप काँग्रेसी, नाव अलीखान महमुदाबाद, धंदे समाजवादी

‘ऑपरेशन सिंदूर’ मदरशांच्या अभ्यासक्रमात शिकवले जाणार

मस्कत ते हिमालय; एव्हरेस्ट बेस कॅम्पला साजरा झाला वाढदिवस

‘राहुल गांधींचे प्रश्न हे बेजबाबदारपणाचे!’

१० मे रोजी भारताने पाकिस्तानच्या रफीकी, मुरिद, नूर खान, रहिम यार खान, सुक्कुर, चूनियन, पस्रूर आणि सियालकोट येथील प्रमुख हवाई तळांवर अचूक हल्ले केले.
नूर खान एअरबेसवर हल्ला करून भारताने इस्लामाबाद आणि रावळपिंडीमधील सत्ता केंद्रांना थेट इशारा दिला. पाकिस्तानच्या क्षेपणास्त्रांचा कमाल टप्पा हरियाणामधील एका शेतापर्यंतच पोहोचला.

 

त्यामुळे मुनीर यांचा “ऐतिहासिक विजय” हा निव्वळ खोटा दावा असल्याचे यातून सिद्ध होते. ही पदोन्नती म्हणजे मुनीर यांची स्वतःच्या अस्तित्वासाठी चाललेली धडपड आहे.

पाकिस्तानमध्ये सत्तेवर अघोषितपणे विराजमान असलेले मुनीर देशातील आर्थिक संकट आणि इम्रान खान यांच्या समर्थकांकडून होणाऱ्या विरोधामुळे दबावाखाली होते. त्यांनी नागरी लोकांवर लष्करी न्यायालयांद्वारे खटले भरायला सुरुवात केली आणि आपला कार्यकाळ ३ वर्षांवरून ५ वर्षांपर्यंत गुपचूप वाढवून घेतला.

१६ एप्रिल रोजी त्यांच्या भाषणात त्यांनी द्विराष्ट्र सिद्धांत, हिंदूंविरोध आणि भारतविरोध वापरून देशात तणाव निर्माण केला – ज्यातून पहलगाम हल्ला उफाळून आला. भारताशी युद्धासारखी परिस्थिती निर्माण करून मुनीर यांनी देशांतर्गत पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version