घरविशेषज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी आता १४ एप्रिलला

ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी आता १४ एप्रिलला

अधिवक्ता विष्णू जैन यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सरन्यायाधीशांनी २१ एप्रिल रोजी ठेवली सुनावणी

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीशी संबंधित प्रकरणाची सुनावणी १४ एप्रिलला होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले.यासोबतच एका याचिकेबाबत न्यायालयाने मुस्लिम पक्षाला दिलासा दिला आहे. मुस्लीम पक्षाला मशिदीच्या आवारात इज्जत करण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल करण्याची मुभा न्यायालयाने दिली.

सर्वोच्च न्यायालयाने हिंदू बाजूच्या याचिकांवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे. या याचिकांवर २१ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

अधिवक्ता विष्णू जैन यांनी न्यायालयाला सांगितले की, ज्ञानवापी मशिदीबाबत वाराणसी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. जिल्हा न्यायाधीशांनी या प्रकरणाचा निर्णय पाच वेळा स्थगित केला आहे. अधिवक्ता विष्णू जैन यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सरन्यायाधीशांनी २१ एप्रिल रोजी सुनावणी करणार असल्याचे सांगितले. ज्ञानवापी मशीद संकुलात ‘शिवलिंग’ सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. हिंदू पक्षकारांना वाराणसी जिल्हा न्यायाधीशांसमोर अर्ज दाखल करण्याची परवानगी देण्यात आली.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीच्या अपीलवर सर्वोच्च न्यायालयाने हिंदू पक्षांना तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देशही दिले होते. रमजाननिमित्त उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीतील सीलबंद करण्यात आलेले क्षेत्र उघडण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. मुस्लीमांच्या पक्षाने वजू परिसराचे (धार्मिक कार्याच्या आधी हात- तोंड धुण्याची जागा) सील काढण्याची मागणी केली आहे. त्यावर न्यायालयाने अर्ज दाखल केल्यानंतर १४ एप्रिलला सुनावणी होईल असे न्यायालयाने म्हटले आहे. रमजानचा महिना असल्याने भाविकांना परिसरात प्रार्थना करण्याची परवानगी दिली पाहिजे असे वरिष्ठ वकील हुजेफा अहमदी यांनी सांगितले . भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी उत्तरात, बार आणि खंडपीठाच्या अहवालानुसार या प्रकरणावर अर्ज सादर करण्यास सांगितले.

हे ही वाचा:

कलम ३७० हटल्यानंतर जम्मू काश्मीरच्या बाहेरील १८५ लोकांनी केली जमीन खरेदी

उत्तरकाशी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली, लोकांचे घाबरून घराबाहेर पलायन

भाजप लक्ष्मणासारखे लोकांचे प्रश्न सोडवतो

हुश्श टेंशन गेलं ईएमआय वाढणार नाही.. रिझर्व्ह बँकेचा व्याज दरवाढीला ब्रेक

गेल्या वर्षी १७ मे रोजी सुप्रीम कोर्टाने वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांना ज्ञानवापी-श्रृंगार गौरी संकुलाच्या आतील भागाचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी अंतरिम आदेश दिले होते जेथे व्हिडिओग्राफिक सर्वेक्षणात ‘शिवलिंग’ आढळले होते.सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिमांना ज्ञानवापी मशिदीत नमाज अदा करण्यासही परवानगी दिली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version