घरविशेषकोविड लस आणि अचानक मृत्यू यामध्ये कोणताही संबंध नाही

कोविड लस आणि अचानक मृत्यू यामध्ये कोणताही संबंध नाही

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) यांच्या व्यापक अभ्यासानुसार कोविड-१९ लसीकरण आणि अचानक होणाऱ्या मृत्यूंमध्ये कोणताही थेट संबंध आढळून आलेला नाही. या अभ्यासांमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, अचानक होणाऱ्या मृत्यूंचे प्रमुख कारण जीवनशैली, पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या आरोग्यविषयक समस्या आणि काही प्रकरणांमध्ये आनुवंशिक घटक आहेत. ICMR आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) यांनी १८ ते ४५ वयोगटातील तरुण प्रौढांमध्ये होणाऱ्या अस्पष्ट आणि अचानक मृत्यूंच्या कारणांचा शोध घेण्यासाठी दोन स्वतंत्र अभ्यास केले.

पहिला अभ्यास ICMRच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीने मे ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत १९ राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशांतील ४७ रुग्णालयांमध्ये केला. या अभ्यासात ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२३ दरम्यान दिसायला निरोगी असणाऱ्या व्यक्तींच्या अचानक मृत्यूंचा मागोवा घेतला गेला. दुसऱ्या अभ्यासात प्रत्यक्ष मृत्यूच्या वेळेवर आधारित विश्लेषण करण्यात आले.

हेही वाचा..

बिहारमध्ये पुन्हा एनडीए सरकार बनेल!

टीएमसी नेत्यांचं मेंदू नीट काम करत नाही…

पांढरे डाग, मधुमेहावर ही आहे चमत्कारी वनस्पती

मालवणीत बघा कोडीन कफ सिरपच्या बाटल्या सापडल्या !

या दोन्ही अभ्यासांमधून हे स्पष्ट झालं की, कोविड लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ आहेत. अचानक मृत्यूंच्यामागे मुख्यत्वे खालील कारणे आढळली: आनुवंशिक घटक (Genetic Factors), अस्वास्थ्यदायक जीवनशैली, पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांची पार्श्वभूमी कोविडनंतर निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या स्थिती (Post-Covid Complications) या वयोगटात हृदयविकाराचा झटका (मायोकार्डियल इन्फार्क्शन) हा मृत्यूचा प्रमुख कारण म्हणून ओळखला गेला आहे.

अभ्यासानुसार, गेल्या काही वर्षांमध्ये मृत्यूच्या कारणांमध्ये फारसा बदल झालेला नाही. काही प्रकरणांमध्ये जनुकीय उत्परिवर्तन (Mutation) देखील एक शक्यताप्राप्त कारण मानले गेले आहे. या अभ्यासाचे अंतिम निष्कर्ष लवकरच प्रसिद्ध केले जातील. वैज्ञानिकांनी स्पष्ट सांगितले आहे की, कोविड लसींमुळे अचानक मृत्यू होत असल्याचे दावे पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत. अशा दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

विशेषज्ञांनी इशारा दिला की, असत्य माहिती पसरविल्यामुळे लसीकरणाविषयी लोकांमध्ये भीती व गैरसमज निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोका निर्माण होऊ शकतो. भारत सरकारने नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुराव्यावर आधारित संशोधनावर भर दिला आहे, जेणेकरून कोविडसारख्या आपत्तीमधून प्रभावी उपाय करता येतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version