घरविशेषटीएमसी नेत्यांचं मेंदू नीट काम करत नाही...

टीएमसी नेत्यांचं मेंदू नीट काम करत नाही…

कोलकात्यातील लॉ कॉलेज गँगरेप प्रकरणावर टीएमसी आमदार मदन मित्रा यांनी दिलेल्या वादग्रस्त प्रतिक्रियेवरून वाद पेटला आहे. या मुद्द्यावरून भाजप नेते दिलीप घोष यांनी टीएमसीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटलं की, “असे नेते फक्त टीएमसीतच आढळतात.” बुधवारी दिलीप घोष म्हणाले, “हे लोक नेहमी फक्त तेव्हा जागे होतात जेव्हा एखादी गोष्ट चुकीची होते. सर्वांनाच माहीत आहे की, हे लोक कधी ठीक असतात, तर कधी नाही. विशेषतः संध्याकाळनंतर यांचा मेंदू नीट काम करत नाही. म्हणून असे नेते फक्त टीएमसीतच आढळतात. त्यांचे वक्तव्य आणि वर्तन बघा की काय पातळी गाठली आहे!”

ते पुढे म्हणाले, “अनुब्रत मंडलसारखा नेता बघा. एवढी मोठी घटना झाली, त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याचा अपमान केला, पण शिक्षा त्या अधिकाऱ्यालाच दिली जात आहे. त्या नेत्याला काहीही झालेलं नाही, कारण टीएमसी ही अशी क्रूर आणि असामाजिक प्रवृत्तीच्या लोकांनी चालवलेली पार्टी आहे. जर अशा लोकांना बाजूला केलं, तर पार्टीच कोसळून जाईल.” मंत्री मानस रंजन भुनिया यांच्या विधानावर दिलीप घोष म्हणाले, “आरजी कर रुग्णालयातील प्रकार ही देखील काही छोटी घटना नव्हे, पण तशीच संबोधली जात आहे! कालीगंजमध्ये एका मुलीवर बॉम्ब हल्ला झाला, त्यालाही ‘छोटी घटना’ म्हणत आहेत, कारण या घटनांमागे त्यांच्या पक्षाचेच लोक आहेत. त्यामुळे मानस भुनिया यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने आणि मंत्र्याने जबाबदारीने आणि जागरुकतेने बोलायला हवं. त्यांना विचार करायला हवा की ते नेमकं कुणाच्या फायद्यासाठी बोलत आहेत. ते स्वतः डॉक्टर आहेत, आणि जर लोक त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत, तर मग कुणावर ठेवणार? जर ते ममता बॅनर्जी यांना खूश करण्यासाठी काहीही बोलत असतील, तर त्यांना लाज वाटली पाहिजे.”

हेही वाचा..

पांढरे डाग, मधुमेहावर ही आहे चमत्कारी वनस्पती

मालवणीत बघा कोडीन कफ सिरपच्या बाटल्या सापडल्या !

दलाई लामा यांची महत्वपूर्ण घोषणा काय ?

पंजाबमध्ये अघोषित आणीबाणी ?

दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जी सरकारवरही टीका केली. त्यांनी म्हटलं, “बंगालमध्ये जर कुणाला कार्यक्रम घ्यायचा असेल, तर विरोधी पक्षाला न्यायालयात जावं लागतं. इतकंच नव्हे तर नेत्यांना राज्यात कुठेही जायचं असेल तरीही कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. मला वाटतं, लग्नासाठीसुद्धा कदाचित कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल. सरकारच्या हातात सत्ताच असेल, तर ते त्याचीही परवानगी नाकारतील!”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version