घरविशेषइराणी सरकारच्या प्रयत्नांचे भारतीय दूतावासाकडून का झाले कौतुक

इराणी सरकारच्या प्रयत्नांचे भारतीय दूतावासाकडून का झाले कौतुक

- Advertisement -

भारताने तीन अपहृत भारतीय नागरिकांची सुटका सुनिश्चित करण्यासाठी इराण सरकारने केलेल्या प्रयत्नांचे आभार मानले असून, हे दोन्ही देशांमधील खऱ्या मैत्रीच्या भावनेचे प्रतीक असल्याचे नमूद केले आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, “तीन्ही अपहृत भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका झाली असून, सध्या ते भारतीय दूतावासाच्या देखरेखीखाली आहेत. त्यांना परत भारतात पाठवण्याची तयारी सुरू आहे. त्यांच्या सुटकेसाठी इराण सरकारने केलेल्या तात्काळ आणि प्रभावी प्रयत्नांसाठी आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो.”

पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे, “तुमचे समर्थन भारत आणि इराणमधील मैत्रीच्या सच्च्या भावनेचे दर्शन घडवते.” भारतामधील इराणी दूतावासाने मंगळवारी उशिरा मेहर न्यूज एजन्सीचा हवाला देत सांगितले की, तेहरान पोलिसांनी तीन लापता भारतीय नागरिकांची सुटका केली आहे. इराणी मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण तेहरानच्या वरामिन परिसरात बंधक बनवून ठेवलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली.

हेही वाचा..

नोएडात बोगस पत्रकार अटकेत

वाराणसीत बकऱ्यांची किंमत बघा कितीवर पोहोचली !

देशात जातीनिहाय जनगणनेची तारीख आली समोर

लेफ्टनंट कर्नल त्यांच्या कुटुंबासह तीन अन्य सैन्य कर्मचारी भूस्खलनानंतर बेपत्ता

जसपाल सिंग, हर्षप्रीत सिंग आणि अमृतपाल सिंग अशी या तिघांची ओळख पटली असून, ते पंजाबचे रहिवासी आहेत. हे तिघे १ मे रोजी तेहरानला पोहोचताच गायब झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ते एका स्थानिक ट्रॅव्हल एजन्सीच्या आमिषाला बळी पडून ऑस्ट्रेलियात नोकरीसाठी निघाले होते. २८ मे रोजी भारतीय दूतावासाने एक अधिकृत निवेदन जारी करून सांगितले होते की, लापता व्यक्तींच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अचानक संपर्कात न आल्याने चिंता व्यक्त केली होती. दूतावासाने तात्काळ इराणी अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची नोंद घेतली होती.

रिपोर्टनुसार, अपहरणकर्त्यांनी कुटुंबीयांकडून १ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, आणि हे धमकीचे कॉल पाकिस्तानी फोन नंबरवरून आले होते, ज्यामुळे हा प्रकार अधिक चिंतेचा ठरला. या घटनेमुळे दोन्ही देशांदरम्यान तात्काळ राजनैतिक पातळीवर संवाद सुरू करण्यात आला. इराणमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना इशारा देत म्हटले की, “इतर देशांमध्ये नोकरी अथवा प्रवासाच्या अमिषाने अनधिकृत व्यक्ती किंवा बेकायदेशीर एजंटांकडून फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सावध राहावे. भारत सरकारने याआधीही इराणमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी प्रवास सल्ला (Travel Advisory) जारी केला होता, ज्यात न तपासलेल्या ट्रॅव्हल एजंटांपासून सावध राहण्याचे, तसेच तेहरानमधील भारतीय दूतावासाशी संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version