घरधर्म संस्कृतीप्रभू श्रीराम मंदिराच्या कळसावरील ध्वजारोहण हा नव्या युगाचा शुभारंभ

प्रभू श्रीराम मंदिराच्या कळसावरील ध्वजारोहण हा नव्या युगाचा शुभारंभ

योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केल्या भावना

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गोरक्षपीठाधीश्वर योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत झालेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या कळसावरील ध्वजारोहण सोहळ्यात सांगितले की, ध्वजारोहण हा यज्ञाची पूर्णाहुती नसून नव्या युगाचा शुभारंभ आहे. प्रभु श्रीरामांचे भव्य मंदिर हे १४० कोटी भारतीयांची आस्था, सन्मान आणि आत्मगौरवाचे प्रतीक आहे.

मुख्यमंत्री योगींनी भव्य मंदिर निर्मितीत योगदान देणाऱ्या कर्मयोग्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, हा दिवस त्या संत, योद्धे आणि श्रीरामभक्तांना समर्पित आहे, ज्यांनी जीवनभर श्रीराम मंदिरासाठी साधना व संघर्ष केला. विवाह पंचमीचा दिव्य योग या उत्सवाचे पावित्र्य अधिक वाढवत आहे. योगींसह उपस्थित सर्वांनी झुकून भगवा ध्वजाला प्रणाम केला.

मुख्यमंत्री योगींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना स्मृतीचिह्नही प्रदान केले.

हे ही वाचा:

“तुम्ही सैन्यासाठी अयोग्य आहात” सर्वोच्च न्यायालयाने ख्रिश्चन अधिकाऱ्याला असे का म्हटले?

“केंद्राने जबरदस्ती हिंदी थोपवली, तर तामिळनाडू भाषा युद्धासाठी सज्ज”

पंतप्रधान मोदी यांनी सप्तमंदिरात केली पूजा-अर्चना

हम तुम जुदा ना होंगे…अलविदा धर्मेंद्र

मुख्यमंत्री योगी म्हणाले, ध्वजारोहण हा धर्माचा प्रकाश अमर असल्याचा आणि रामराज्याचे मूल्य कालजयी असल्याचा उद्घोष आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी जबाबदारी स्वीकारली, तेव्हा भारतवासियांच्या मनात उमटलेली आशा आणि विश्वास आज राम मंदिराच्या रूपाने साकार झाला आहे. मंदिरावरील भगवा ध्वज हा धर्म, मर्यादा, सत्य-न्याय आणि राष्ट्रधर्म यांचे प्रतीक आहे. तो विकसित भारताची संकल्पना दर्शवतो.

नव्या भारताची झेप

ते पुढे म्हणाले, संकल्पाचा पर्याय नसतो. ११ वर्षांत भारताने विकास आणि परंपरेचे अतिशय सुंदर मिश्रण अनुभवले आहे. ८० कोटींना मोफत रेशन, ५० कोटींना मोफत आरोग्यसेवा, प्रत्येक गरजूला घर, आणि योजनांचे लाभ भेदभावाशिवाय मिळण हेच रामराज्याचे प्रत्यक्ष स्वरूप आहे.

५०० वर्षांची अढळ आस्था

मुख्यमंत्री म्हणाले, ५०० वर्षांत साम्राज्ये बदलली, पिढ्या बदलल्या, पण आस्था अढळ राहिली, न डगमगली, न झुकली. आरएसएससारख्या संस्थांनी जबाबदारी घेतली तेव्हा ‘रामलला हम आएंगे, मंदिर वहीं बनाएंगे’ हा जनघोष सर्वांच्या कंठी होता. कधीकाळी संघर्षाने भरलेली अयोध्या आज पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात जगातील उत्सवांची राजधानी बनत आहे.

योगी म्हणाले, रामललांच्या नगरीने आस्था व आधुनिकतेचे, तसेच आस्था व अर्थव्यवस्थेचे नवे युग सुरू केले आहे.पंचकोसी, १४ कोसी आणि ८४ कोसी परिक्रमा या सुविधा भक्तांना नवा मार्ग व आस्थेला नवे सन्मान देत आहेत. महर्षी वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळ उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी देत आहे. अयोध्या देशाची पहिली सौर ऊर्जा-आधारित सस्टेनेबल स्मार्ट सिटी बनत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version