घरराजकारण“केंद्राने जबरदस्ती हिंदी थोपवली, तर तामिळनाडू भाषा युद्धासाठी सज्ज”

“केंद्राने जबरदस्ती हिंदी थोपवली, तर तामिळनाडू भाषा युद्धासाठी सज्ज”

स्टॅलिन पुत्र उदयनिधी बरळले

तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टालिन यांनी मंगळवारी स्पष्ट इशारा दिला की, केंद्र सरकारने जबरदस्ती हिंदी लादण्याचा प्रयत्न केला, तर राज्य जोरदार विरोध करेल. त्यांनी सांगितले की, आवश्यकता भासल्यास द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) “भाषा युद्ध” छेडण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

चेन्नईत एबीपी नेटवर्कच्या सदर्न रायझिंग समिट २०२५ मध्ये बोलताना ते म्हणाले की, देशात सत्तेचे केंद्रीकरण वाढत आहे आणि राज्यांच्या अधिकारांवर गदा येत आहे. जर आमच्यावर जबरदस्ती हिंदी लादली गेली, तर तमिळनाडू भाषा युद्धापासून मागे हटणार नाही. तामिळनाडूने सुरुवातीपासूनच हिंदी लादण्याला विरोध केला आहे.

ते पुढे म्हणाले, “आम्ही नेहमी आमच्या भाषेचे, राज्याच्या हक्कांचे, लोकशाहीचे आणि आता जनतेच्या मतदानाच्या हक्कांचे संरक्षण करत आलो आहोत.”

उदयनिधी यांनी तमिळ भाषेत बोलताना आरोप केला, “भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आर्थिकदृष्ट्या मजबूत राज्यांना राजकीयदृष्ट्या कमजोर करण्याचा आणि राजकीयदृष्ट्या मजबूत राज्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल करण्याचा प्रयत्न करत आहे.”

ते म्हणाले की तमिळनाडूला कर वाटपातील अन्याय, निधी रोखणे, केंद्राच्या अटींच्या योजना, नवी शिक्षण नीती आणि आता प्रस्तावित डिलिमिटेशन एक्सरसाईज यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे.

हे ही वाचा:

धर्मध्वज फडकवल्यानंतर शतकानुशतकांच्या जुन्या जखमा भरून आल्या!

राम मंदिरावरील धर्मध्वजाबद्दल जाणून घ्या ‘या’ विशेष गोष्टी!

हक्काचा मतदार देश सोडून चालला ममतांचा रक्तदाब वाढला…

आधीच दिल्लीत प्रदूषण; त्यात आली इथियोपियाची राख

“हा आमचा द्रविड एल्गोरिदम”

उदयनिधी यांनी कंप्युटर सायन्स आणि द्रविड राजकीय विचारसरणी यांची तुलना करताना सांगितले, जसे संगणकात एखाद्या समस्येचे निराकरण करण्यासाठी ‘अल्गोरिदम’ असतो, तो मशीनला नेमके काय करायचे ते सांगतो. तसेच तमिळनाडूची राजकारण पद्धतही ठरलेल्या नियमांनुसार चालते. यालाच आम्ही ‘द्रविड एल्गोरिदम’ म्हणतो.

ते म्हणाले की हा ‘एल्गोरिदम’ गेल्या १०० वर्षांत सामाजिक न्याय, सांस्कृतिक अभिमान आणि राजकीय सुधारणा यांपासून तयार झाला आहे. आणि तोच तमिळ समाजाला मोठे राजकीय निर्णय घेताना मार्गदर्शन करतो.
ते म्हणाले, “याच तत्वांमुळे तमिळ जनता कधीही केंद्राच्या दबावाखाली झुकणार नाही.”

डीएमकेची भूमिका कायम

उपमुख्यमंत्री म्हणाले की डीएमके नेहमीच भाषा, राज्यांचे अधिकार, लोकशाही आणि आता मताधिकाराच्या बचावासाठी संघर्ष करत राहील.

समिटविषयी माहिती

एबीपी नेटवर्कचे फ्लॅगशिप साउदर्न रायझिंग समिट चे तिसरे संमेलन चेन्नई येथील आयटीसी ग्रँड चोला येथे होत आहे. यावर्षीची थीम आहे — “भविष्यासाठी तयार: इनोव्हेशन, ट्रान्सफॉर्मेशन, इंस्पिरेशन”. हा कार्यक्रम दक्षिण भारताच्या राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रभावावर केंद्रित आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version