पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मुंबईत राहणाऱ्या कृष्णा शेषाद्री यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. कृष्णा शेषाद्री यांनी तयार केलेल्या वेबसाइटवर भारताच्या इतिहासाची माहिती सहजपणे मिळते आणि ती अतिशय रंजक असल्याचे त्यांनी सांगितले.
रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’च्या १३७व्या भागात पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपणा सर्वांना माहिती आहे की ‘मन की बात’ हा असा एक मंच आहे, जिथे आपण नवीन प्रयत्नांना लोकांसमोर आणतो. देशवासीयांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांवर चर्चा करतो. यापैकी अनेक कल्पनांच्या मागे लोकांनी आपल्या आयुष्याची अथक ऊर्जा खर्च केलेली असते.”
याचदरम्यान, पंतप्रधान मोदींनी कृष्णा शेषाद्री यांच्या प्रयत्नांचा उल्लेख करताना सांगितले, “काही काळापूर्वी सोशल मीडियावर कोणीतरी लिहिले होते की, ‘आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने इतिहास रंजक बनवण्याच्या माझ्या प्रयत्नाची सुरुवात करत असल्याचे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे.’ पुढे त्यांनी सांगितले की, ही कल्पना अतिशय सोपी आहे. तुम्ही या वेबसाइटवर जा आणि कोणतेही एक वर्ष निवडा. तेथे त्या काळात भारताच्या कोणत्या भागावर कोणाचे राज्य होते, हे तुम्हाला सहजपणे समजेल. मलाही हे अतिशय रंजक वाटले.”
हे ही वाचा:
शाळेची इमारत वाहून गेली; पण मुख्याध्यापकांनी वाचवले १६०० विद्यार्थ्यांचे प्राण
एचडीएफसी बँकेला धक्का; सीईओ जगदीशन पदावरून पायउतार
पोलिसांचे चालले आहे काय? उबाठा आमदाराचा ईदचा जुलुस हनुमान मंदिर झाकले |
एव्हरेस्ट, लालजी गोधू हिंगावर बंदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी विचार केला की याबाबत अधिक माहिती घ्यावी. तेव्हा मला समजले की हे काम मुंबईत राहणाऱ्या कृष्णा शेषाद्री यांनी केले आहे. विशेष म्हणजे, कृष्णा यांनी वेबसाइटचे नावही अतिशय सोपे ठेवले आहे. त्यांनी केलेल्या या प्रयत्नाची माहिती तुमच्यापर्यंतही पोहोचली पाहिजे. म्हणून मी विचार केला की, कृष्णाशी थेट संवाद का साधू नये?”
पंतप्रधान मोदींनी कृष्णा यांना विचारले की, “तुम्ही तंत्रज्ञान क्षेत्रातील आहात आणि इतिहासाचे शिक्षकही नाहीत, तरीही तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून इतिहासाची वेबसाइट तयार केली. यामागची प्रेरणा काय?”
यावर कृष्णा यांनी उत्तर देताना सांगितले, “मी एक अभियंता होतो. मी एमबीए केले आणि मार्केटिंग क्षेत्रात नोकरी केली. मला लहानपणापासून इतिहासाची आवड होती. मला असे वाटायचे की, आपण ज्या पद्धतीने इतिहास शिकवतो, त्यात खूप सुधारणा आणि बदल करता येऊ शकतात. तसेच इतिहास लोकांपर्यंत कथांच्या स्वरूपात पोहोचवता येऊ शकतो.”
