घरविशेषपंतप्रधान मोदींची दूरदृष्टीपूर्ण कल्पना बघा

पंतप्रधान मोदींची दूरदृष्टीपूर्ण कल्पना बघा

२०१० साली, जेव्हा गुजरात राज्य स्थापनेला ५० वर्षं पूर्ण झाली होती, तेव्हा त्यावेळचे मुख्यमंत्री आणि सध्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आगळीवेगळी आणि दूरगामी कल्पना प्रत्यक्षात आणली. त्यांनी गांधीनगरमधील महात्मा मंदिर संकुलात “टाइम कॅप्सूल” म्हणजेच ‘कालपेटी’ भूमीत पुरली. या उपक्रमाचा उद्देश होता – गुजरातच्या १९६० पासून २०१० पर्यंतच्या प्रवासाला भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवणे. ही टाइम कॅप्सूल आता १००० वर्षांनंतर उघडण्यात येणार आहे. या ऐतिहासिक घटनेचा एक व्हिडिओ अलीकडेच ‘मोदी स्टोरी’ नावाच्या सोशल मीडिया खात्याने ‘एक्स’ (पूर्वीचा ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर शेअर केला. या व्हिडिओचे शीर्षक होते – “गुजरात टाइम कॅप्सूल – मोदींच्या कालातीत वारशाला एक श्रद्धांजली.”

ही कालपेटी सुमारे ९० किलो वजनाची असून स्टेनलेस स्टीलपासून बनवण्यात आली आहे. ती हजारो वर्षं टिकून राहील अशा पद्धतीने तयार केली गेली आहे. या कॅप्सूलमध्ये गुजरातची विकासयात्रा, संस्कृती, व्यापार, अध्यात्म आणि ऐतिहासिक कामगिरी दाखवणाऱ्या अनेक वस्तू आणि दस्तऐवज ठेवण्यात आले आहेत. यामध्ये महात्मा गांधींच्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश आहे, तसेच रविशंकर महाराजांच्या ऐतिहासिक भाषणाचाही अंतर्भाव आहे – ज्यांनी गुजरात राज्याच्या निर्मितीसाठी प्रेरणा दिली होती. यासोबतच गुजरातच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक टप्प्यांचं विस्तृत वर्णन या कॅप्सूलमध्ये करण्यात आलं आहे. हे सर्व अभिलेख चार भाषांमध्ये लिहिले गेले आहेत – गुजराती, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत.

हेही वाचा..

पाकिस्तानी पोलिसातील माजी एसआयसोबत ज्योती मल्होत्राची होत होती ‘थेट बातचीत’

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी मानले ब्रिटनचे आभार

सामना हरल्यावर रेफरीला दोष देण्याची नवी सवय

आयोध्येत श्रद्धाळूंना लवकरच दर्शनाची होणार सोय

गुजरातच्या चौथ्या वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष यमल व्यास यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं की, ही कल्पना मोदींची होती. त्यांनी स्पष्ट केलं, “२०१० मध्ये मोदींनी राज्याच्या संस्कृतीला जतन करून ठेवण्यासाठी एक दूरदृष्टीपूर्ण प्रस्ताव दिला होता. या कॅप्सूलमध्ये गुजरातचा एक संक्षिप्त पण सविस्तर इतिहास आहे, जो चार भाषांमध्ये लिहिला आहे. शिवाय, गेल्या ५० वर्षांत राज्यात झालेल्या विकासाचंही सविस्तर दस्तऐवजीकरण करण्यात आलं आहे.”

या दस्तऐवजांसाठी वापरलेला कागदसुद्धा विशेष होता. त्यामध्ये प्लास्टिक मिसळलेलं होतं, जेणेकरून ते हजारो वर्ष टिकतील आणि वाचता येतील. ही टाइम कॅप्सूल केवळ एका ऐतिहासिक क्षणाची आठवण नव्हे, तर गुजरातच्या ओळखीचा, आत्मबलाचा आणि सांस्कृतिक ठेव्याचा एक अभिमानास्पद प्रतीक आहे – जे पुढील अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version