घरविशेषउपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ९ सप्टेंबरला!

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ९ सप्टेंबरला!

निवडणूक आयोगाची घोषणा 

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर, भारताच्या पुढील उपराष्ट्रपतीची निवड ९ सप्टेंबर रोजी होणार असल्याची घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने केली आहे. वेळापत्रकानुसार, नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट आहे, तर मतदान ९ सप्टेंबर रोजी होईल. तर मतदानाच्या दिवशीच मतमोजणी केली जाईल आणि निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे आता देशाच्या उपराष्ट्रपतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

गृह मंत्रालयाने २२ जुलै २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे रिक्त पदाची पुष्टी केली. कायद्यानुसार, अशा रिक्त पदावर लवकरात लवकर निवडणूक घेणे आवश्यक आहे. निवडून आलेली व्यक्ती पदभार स्वीकारल्यापासून पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल.

१७ वी उपराष्ट्रपती निवडणूक राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, १९५२ मध्ये नमूद केलेल्या नियमांनुसार होईल. जगदीप धनखड यांनी २२ जुलै रोजी “आरोग्यसेवेला प्राधान्य देण्यासाठी” भारताच्या उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. २०२२ पासून या भूमिकेत काम करणाऱ्या ७४ वर्षीय धनखड यांनी राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अध्यक्षपद भूषवल्यानंतर ही घोषणा केली.

हे ही वाचा : 

माजी जेडी(एस) खासदार प्रज्वल रेवण्णा बलात्कार प्रकरणात दोषी!

राहुल गांधींचे वर्तन सहन करण्यापलिकडे, ते देशाचा द्वेष करू लागलेत!

कोलकातामध्ये बांगलादेशी मॉडेलला अटक!

‘ऑपरेशन महादेव’नंतर ‘ऑपरेशन शिवशक्ती’ सुरू, १०० दिवसांत १२ दहशतवादी ठार!

“आरोग्य सेवेला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी, मी संविधानाच्या कलम ६७(अ) नुसार तात्काळ प्रभावीपणे भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे,” असे धनखर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. भारतीय संविधानाच्या कलम ६६ नुसार उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य असलेल्या निर्वाचक मंडळाद्वारे केली जाते. सदस्य एकल हस्तांतरणीय मतदान प्रणाली वापरून गुप्त मतदानाद्वारे मतदान करतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version