सिडनीतील सामूहिक गोळीबारानंतर ऑस्ट्रेलिया सरकारचे मोठे पाऊल

शस्त्रे परत खरेदी करून नष्ट करणार

सिडनीतील सामूहिक गोळीबारानंतर ऑस्ट्रेलिया सरकारचे मोठे पाऊल

सिडनीतील बॉन्डी बीचवर ज्यू समुदायावर झालेल्या हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियात कायदे बदलण्यावर चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी शुक्रवारी जाहीर केले की बॉन्डी बीच गोळीबारानंतर बंदुकांची संख्या कमी करण्यासाठी नॅशनल फायरआर्म बायबॅक स्कीम सुरू करण्यात येणार आहे. कॅनबेरामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान अल्बनीज म्हणाले की, केंद्र सरकार अतिरिक्त, नव्याने प्रतिबंधित तसेच बेकायदेशीर शस्त्रे परत खरेदी करून नष्ट करण्यासाठी राष्ट्रीय बायबॅक योजना राबवेल. सध्या ऑस्ट्रेलियात ४० लाखांहून अधिक शस्त्रे आहेत, जी पोर्ट आर्थर हत्याकांडाच्या काळातील संख्येपेक्षा जास्त आहेत. या बायबॅक अंतर्गत शस्त्रांचे संकलन, प्रक्रिया आणि देयके यांची जबाबदारी ऑस्ट्रेलियातील राज्ये व प्रदेशांची असेल, तर जमा करण्यात आलेली शस्त्रे नष्ट करण्याची जबाबदारी ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिस यांची असेल.

खरं तर, १९९६ मध्ये तस्मानियातील आयलंड स्टेटमध्ये झालेल्या पोर्ट आर्थर नरसंहारात ३५ लोकांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे ३७ जण जखमी झाले होते. या भीषण गोळीबारानंतर ‘गन बायबॅक’ कायदा लागू करण्यात आला होता, ज्याअंतर्गत मोठ्या प्रमाणावर शस्त्रे परत घेऊन नष्ट करण्यात आली होती. प्रस्तावित नॅशनल बायबॅकही याच धर्तीवर आणली जात आहे. न्यूज एजन्सी सिन्हुआच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले की या योजनेमुळे लाखो शस्त्रे जमा होऊन नष्ट केली जातील, अशी त्यांना अपेक्षा आहे. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की सिडनीच्या बॉन्डी बीचवरील सामूहिक गोळीबारात सहभागी असलेल्या दोन सशस्त्र व्यक्तींमधील एक साजिद अकरम हा मूळचा हैदराबादचा रहिवासी होता; मात्र १९९८ मध्ये ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर त्याचा कुटुंबाशी फारसा संपर्क नव्हता.

हेही वाचा..

‘विकसित भारत जी-राम जी’ विधेयक म्हणजे ‘विकसित भारत’च्या व्हिजनचे दर्शन

शेअर बाजारात भारतीयांकडून गुंतवणुकीचा ओघ

ईडीकडून सौम्या चौरसिया अटकेत

“डंकी रूट” प्रकरणी छापेमारी; रोख रकमेसह सोने- चांदी जप्त

तेलंगणाचे पोलीस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांनीही स्पष्ट केले आहे की १९९८ मध्ये भारत सोडण्यापूर्वी अकरमविरुद्ध कोणताही गुन्हेगारी नोंद नव्हती. तपासात असेही समोर आले की साजिद अकरम हैदराबादचा रहिवासी होता. त्याने हैदराबादमध्ये बी.कॉम पदवी पूर्ण केली होती आणि नोव्हेंबर १९९८ मध्ये नोकरीच्या शोधात ऑस्ट्रेलियाला गेला होता.

Exit mobile version