दित्वाह चक्रीवादळामुळे मृतांचा आकडा १५३ वर

भारतीय हेलिकॉप्टरांनी वाचवले ८ जीव

दित्वाह चक्रीवादळामुळे मृतांचा आकडा १५३ वर

श्रीलंकेत दित्वाह चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या आपत्तीमध्ये मृतांची संख्या वाढून १५३ झाली आहे. स्थानिक माध्यमांनी डिजास्टर मॅनेजमेंट सेंटर (डीएमसी) च्या हवाल्याने सांगितले की किमान १९१ जण बेपत्ता आहेत. त्यामुळे बचाव कार्य आणखी गतीमान करण्यात आले आहे. न्यूज आउटलेट डेली मिररच्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे, पूर आणि सतत होणाऱ्या भूस्खलनामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान अद्याप खराब असून परिस्थिती गंभीर आहे. सरकारने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार २५ जिल्ह्यांतील २,१७,२६३ कुटुंबांमधील ७,७४,७२४ लोक या आपत्तीत प्रभावित झाले आहेत. अजूनही अनेक क्षेत्रे पूर, भूस्खलन आणि जोरदार पावसाच्या तडाख्यात आहेत.

डीएमसीने सांगितले की २७,४९४ कुटुंबांतील १,००,८९८ लोकांना विविध राहत छावण्यांत आश्रय देण्यात आला आहे. देशभरात ७९८ राहत छावण्यांत नागरिकांना ठेवण्यात आले आहे. अधिकारी सतत मदत पोहोचविण्याचे आणि बेघर झालेल्या लोकांच्या सुरक्षेचे काम करत आहेत. आपत्तीमुळे काही भागांचा संपर्क तुटला असून रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळे येत आहेत. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या मीडिया विभागाने सांगितले की, दूरसंचार नेटवर्कवरील ताण कमी करण्यासाठी आणि आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी टेलिकॉम ऑपरेटरांनी इमर्जन्सी कॉल्सना प्राधान्य देण्याचे मान्य केले आहे. मात्र रविवारीपासून हवामानात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा..

देशातील इलेक्ट्रॉनिक्स, आयटी उद्योग बजावणार मोठी भूमिका

हर्ष फायरिंगमध्ये लग्नात वराचा मृत्यू

‘मन की बात’ मध्ये पंतप्रधानांनी केली शांती-करुणेच्या परंपरेची आठवण

कट, फसवणूक, विश्वासघात… नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल आणि सोनियांवर एफआयआर दाखल, गुन्हेगारी कटाचा आरोप

दरम्यान, भारतानेही या संकटात श्रीलंकेला मदतीचा हात दिला आहे. भारतीय बचाव पथके — श्रीलंका एअरफोर्स, नेव्ही, आर्मी, पोलीस आणि स्थानिक प्रथम प्रतिसाद देणाऱ्यांसह — पूरग्रस्त लोकांना मदत करत आहेत. पूरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे, साहित्य पोहोचविणे आणि आवश्यक आपत्कालीन सहाय्य पुरविण्याचे कार्य सुरू आहे. भारतीय नौदलाच्या २ हेलीकॉप्टरांनी पन्नाला परिसरात पूरपाण्यात अडकलेल्या ८ लोकांचे प्राण वाचवले. अधिकाऱ्यांनी सांगितले की सध्या ४ भारतीय हेलीकॉप्टर संपूर्ण देशभर बचाव मोहिमेत गुंतले आहेत. यात २ हेलीकॉप्टर हे विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवरून कार्यरत आहेत. हेलीकॉप्टरांनी पन्नाला भागात अनेक उड्डाणे केली आणि पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने घरांपर्यंत पोहोचणे कठीण असतानाही लोकांना सुरक्षित स्थळी हलवून स्थानिक प्रशासनाच्या ताब्यात दिले.

Exit mobile version