चोराच्या उलट्या बोंबा; पाकिस्तान म्हणतो, काश्मीरसाठी भारताने पुढाकार घ्यावा!

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे विधान

चोराच्या उलट्या बोंबा; पाकिस्तान म्हणतो, काश्मीरसाठी भारताने पुढाकार घ्यावा!

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध सामान्य करण्यावर भर देताना काश्मीर मुद्दा आणि गाझा युद्धाचा एकाच वेळी उल्लेख केला आहे. लंडनमधील परदेशातील पाकिस्तानी समुदायाला संबोधित करताना शरीफ यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आणि सांगितले की, या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे भारताचे काम आहे.

“भारत आणि पाकिस्तान हे शेजारी आहेत आणि आपण एकत्र राहायला शिकले पाहिजे. परंतु, काश्मीर प्रश्न सुटल्याशिवाय संबंध सामान्य होऊ शकत नाहीत. काश्मिरींचे रक्त व्यर्थ जाणार नाही,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, ”जर कोणाला असे वाटत असेल की काश्मीर प्रश्न सोडविल्याशिवाय भारत-पाकिस्तान संबंध प्रस्थापित होऊ शकतात, तर ते मूर्खांच्या स्वर्गात राहत असतील.”

“आम्ही चार युद्धे लढली आहेत, ज्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च झाले आहेत. त्या निधीचा वापर पाकिस्तानच्या लोकांच्या विकास आणि समृद्धीसाठी व्हायला हवा होता,” शरीफ पुढे म्हणाले. भारताने सहकारी शेजारी असण्याऐवजी लढाऊ वर्तन स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला. “आपण शांततेत राहायचे की लढत राहायचे हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण एकमेकांवर प्रेम करून आणि आदराने जगावे अशी आपली इच्छा आहे,” असे ते म्हणाले. 

यानंतर शरीफ यांनी गाझामधील इस्रायल-हमास युद्धावर भाष्य करताना तेथील मानवी संकटाची गंभीर दखल घेतली. ते म्हणाले, “गाझामध्ये आतापर्यंत ६४,००० हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यांच्यासाठी अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. ते ना काही कमवू शकतात, ना जगू शकतात. परिस्थिती अत्यंत भीषण आहे.” शरीफ यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला गाझातील मानवतावादी संकटावर त्वरित आणि निर्णायक कारवाई करण्याचे आवाहन केले.

हे ही वाचा :

“राहुल गांधी पप्पू आहेत आणि पप्पूसारखेच बोलतात”

 नोएडा विमानतळावरून लवकरच कमर्शियल उड्डाणे

प्रशांत किशोर यांना तोट्यातील कंपन्यांकडून मिळाले कोट्यवधी

नेपाळनंतर आता फिलीपिन्समध्येही सरकारविरोधात तीव्र निदर्शने!

दरम्यान, २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर आणि त्यानंतर भारताकडून इस्लामाबादविरुद्ध करण्यात आलेल्या राजनैतिक उपाययोजनांमुळे, अण्वस्त्रधारी शेजारी देश भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडले आहेत. अशा संवेदनशील काळात, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे भारताशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न हे हताशतेतून प्रेरित असल्याचे मानले जात आहे.

Exit mobile version