आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्व सरमा यांनी रविवारी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. न्यूज १८ इंडियाच्या ‘एजेंडा असम’ कार्यक्रमात बोलताना त्यांनी दावा केला की, काँग्रेसच्या कार्यकाळात विकासकामे झाली नाहीत. “त्या वेळी सरकारमध्ये इंजिनच नव्हते,” असा टोला त्यांनी लगावला.
राहुल गांधी यांच्या हाफ टी-शर्ट परिधान करण्यावरही त्यांनी टीका केली आणि त्यांचे वर्तन “विकृत” असल्याचे म्हटले. “चॅटजीपीटी देखील राहुल गांधींना वेडगळ म्हणेल. कडाक्याच्या थंडीत हाफ टी-शर्ट घालणे सामान्य नाही,” असे ते म्हणाले.
त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, राहुल गांधी यांचे वर्तन पाहिले तर कुणीही त्यांना वेडपट म्हणेल. त्यांच्या वेडगळपणाच्या कृतीची यादी तयार करून मी चॅट जीपीटीला दिली तेव्हा सदर व्यक्ती विचित्र, विकृत असल्याचे सांगण्यात आले. त्यांची कृतीच तशी आहे.
हे ही वाचा:
अमेरिकन विमानवाहू नौकेतच मूलभूत सुविधांचा बोजवारा
चुकीची आर्थिक उत्पादने विकलीत तर याद राखा!
मोदी सरकारच्या ११ वर्षांतील कामगिरीचा उल्लेख
न्यूज१८ इंडियाचे व्यवस्थापकीय संपादक ज्योती कमल यांच्याशी संवाद साधताना सरमा म्हणाले की, काँग्रेसकडे तुलना करण्यासारखे काही नाही. “मोदी सरकारच्या ११ वर्षांत विकास स्पष्टपणे दिसून येतो,” असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने प्रगती साधल्याचा दावा त्यांनी केला.
घुसखोरीच्या मुद्द्यावर कठोर भूमिका
घुसखोरीच्या प्रश्नावर सरमा यांनी कठोर भूमिका मांडली. “आसामची जमीन बळकावणाऱ्यांना बांगलादेशात पाठवणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. आसाम करारानंतर राज्यात घुसखोरी वाढल्याचा आरोप त्यांनी केला. राज्याच्या अस्मितेचे रक्षण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गौरव गोगोई यांच्या पत्नीबाबत वादग्रस्त विधान
सरमा यांनी काँग्रेस नेते गौरव गोगोई यांच्या पत्नीबाबतही गंभीर आरोप केले. “माझी लढाई गोगोई यांच्याशी नाही, तर पाकिस्तानशी आहे. भारतात कोणत्याही पाकिस्तानी ‘अॅसेट’ला स्थान नाही,” असे ते म्हणाले. आपल्या वक्तव्यावर आक्षेप असल्यास न्यायालयात जाण्याचे आव्हानही त्यांनी दिले.
