‘मन की बात’: ऊर्जा संकटात एकजूट राहा!

 देश ठामपणे संकटाचा सामना करत असल्याचे पंतप्रधानांचे वक्तव्य

‘मन की बात’: ऊर्जा संकटात एकजूट राहा!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ च्या १३२ व्या भागाला संबोधित केले. या भागाच्या सुरुवातीलाच त्यांनी मध्यपूर्वेतील तणाव आणि ऊर्जा संकटाचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी नोकरीसाठी मध्यपूर्वेतील देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी आखाती देशांच्या सरकारचे आभार मानले. तसेच सध्याच्या ऊर्जा संकटाच्या परिस्थितीत भारत ठामपणे त्याचा सामना करत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नरेंद्र मोदी म्हणाले, “मार्च महिना जागतिक स्तरावर खूपच हालचालींनी भरलेला राहिला आहे. आपल्याला आठवतं की, कोविडमुळे संपूर्ण जगाला बराच काळ अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्या संकटातून बाहेर पडल्यावर जग नव्या प्रगतीच्या मार्गावर जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र सध्या जगातील विविध भागांत युद्ध आणि संघर्ष वाढत आहेत. आपल्या शेजारील प्रदेशात गेल्या महिन्याभरापासून तीव्र युद्ध सुरू आहे.”

आखाती देशांचे आभार मानताना त्यांनी सांगितले, “आपल्या लाखो कुटुंबांचे नातेवाईक या देशांत राहतात, विशेषतः आखाती देशांमध्ये काम करतात. मी त्या देशांचा आभारी आहे की, ते एक कोटीहून अधिक भारतीयांना सर्व प्रकारची मदत करत आहेत. ज्या भागात सध्या युद्ध सुरू आहे, तो भाग आपल्या ऊर्जा गरजांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे जगभरात पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्याबाबत तणाव निर्माण होत आहे.”

हे ही वाचा:

शिखरापासून संघर्षापर्यंतचा प्रवास अखेर संपला

‘धुरंधर’ पाहून लोक आक्रमक देशभक्ती साजरी करतायत!

LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर PNG विस्ताराला गती

मोदींच्या ‘मेक इन इंडिया’चा चेहरा: अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन

पुढे त्यांनी स्पष्ट केले की, भारत सध्याच्या ऊर्जा संकटाचा ठामपणे सामना करत आहे आणि नागरिकांना एकजूट राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “आपले जागतिक संबंध, विविध देशांकडून मिळणारे सहकार्य आणि गेल्या दशकात देशाने मिळवलेली ताकद यामुळे भारत या परिस्थितीला समर्थपणे तोंड देत आहे. हा आव्हानात्मक काळ आहे. सर्व देशवासीयांनी एकजूट राहून या संकटातून बाहेर पडणे गरजेचे आहे.”

तसेच त्यांनी इशारा दिला की या विषयावर राजकारण करणे योग्य नाही. “हा विषय देशातील १४० कोटी नागरिकांच्या हिताशी संबंधित आहे. त्यामुळे यात राजकारणाला स्थान नसावे,” असेही त्यांनी नमूद केले.

Exit mobile version