पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेसवर जोरदार टीका करत, सत्तेत असताना काँग्रेसने आसाम आणि ईशान्य भारताकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, तसेच प्रदेशाची सुरक्षा पणाला लावत घुसखोरांचे संरक्षण केले, असा आरोप केला.
गुवाहाटी विमानतळावरील नव्या टर्मिनलचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, निवडणूक आयोगाने राबवलेली विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रिया ही घुसखोरांना लोकशाही प्रक्रियेपासून दूर ठेवण्यासाठी आहे. यावेळी त्यांनी आरोप केला की काही “देशद्रोही” लोक घुसखोरांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
“घुसखोरी रोखण्यासाठी केंद्र सरकार कठोर पावले उचलत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
‘पृथ्वीराज चव्हाण यांना म्हातारचळ लागला आहे!’
ईशान किशनला टी-२० विश्वचषक २०२६ संघात स्थान
“हिंदू तरुणाच्या मारेकऱ्यांना बांगलादेश काय शिक्षा देणार?
विजयासोबत हार्दिकची माणुसकी जिंकली
काँग्रेसच्या काळात घुसखोरांना मोकळीक
पंतप्रधान मोदींनी ठामपणे सांगितले की, आसाम आणि ईशान्य भारताचा विकास काँग्रेसच्या अजेंड्यावर कधीच नव्हता.
त्यांनी आरोप केला की, काँग्रेसच्या काळात घुसखोरांना जंगलांची आणि जमिनींची बळकावणी करू दिली गेली, ज्यामुळे राज्याची सुरक्षा आणि सांस्कृतिक ओळख धोक्यात आली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भाजप सरकार आता त्या चुका दुरुस्त करत आहे, ज्या काँग्रेसने दशकानुदशके या प्रदेशात केल्या.
डबल इंजिन सरकार’ आणि ब्रह्मपुत्रेची उपमा
भाजपच्या प्रशासन मॉडेलवर प्रकाश टाकताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “डबल इंजिन सरकार” अंतर्गत आसाममध्ये विकास अखंडपणे वाहत आहे, अगदी प्रचंड ब्रह्मपुत्रा नदीप्रमाणे.
त्यांनी सांगितले की, आसामशी असलेली आपली भावनिक नाळ त्यांना प्रेरणा देते. आसाम आणि संपूर्ण ईशान्य भारत हे आता भारताच्या विकासाचे प्रवेशद्वार म्हणून पुढे येत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
“देशातील प्रत्येक राज्य आणि प्रत्येक प्रदेशाचा विकसित भारताच्या ध्येयात महत्त्वाचा वाटा आहे,”
असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
गुवाहाटीत भव्य रोड शो
यानंतर संध्याकाळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आसाम दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी गुवाहाटीत भव्य रोड शोचे नेतृत्व केले. हा रोड शो सरुसजाई येथील अर्जुन भोगेश्वर बरुआ क्रीडा संकुलाजवळ (राष्ट्रीय महामार्ग २७) सुरू झाला आणि बसिष्ठ चारिआलीजवळील भाजपच्या राज्य मुख्यालयात समाप्त झाला.
दिवसभराचा कार्यक्रम
गुवाहाटीत आगमनानंतर पंतप्रधान मोदींनी आसामचे पहिले मुख्यमंत्री गोपीनाथ बोरदोलोई यांच्या पुतळ्याचे अनावरण केले तसेच नव्या विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन केले.
रोड शो नंतर त्यांनी भाजपच्या राज्य नेतृत्वासोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
