भाजप आमदाराने ऑफिसचे केले जन सेवा केंद्रात रुपांतर

भाजप आमदाराने ऑफिसचे केले जन सेवा केंद्रात रुपांतर

दिल्लीतील ग्रेटर कैलाश मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजप आमदार शिखा राय यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी आपल्या निवासस्थानीच ‘जन सेवा केंद्र’ सुरू केले असून, याचे उद्घाटन मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते रविवारी पार पडले. या कार्यक्रमाला भाजप खासदार बांसुरी स्वराज यांचीही उपस्थिती होती. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, “भाजपचे सर्व आमदार जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. शिखा राय यांच्या कार्यालयाला ‘जन सेवा केंद्र’ असे नाव देण्यात आले आहे. येथे नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केले जाईल. आमचे आमदार प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करत आहेत. दिल्लीमध्ये विकासकामांबरोबरच लोकांची कामे वेगाने मार्गी लागतील.”

मुख्यमंत्री गुप्ता यांनी शिखा राय यांची प्रशंसा करताना सांगितले, “शिखा राय यांनी गेली अनेक वर्षे जनसेवेसाठी दिली आहेत. मी त्यांना ३० वर्षांपासून पाहत आहे. त्या नेहमी जनतेमध्ये राहून त्यांच्या प्रश्नांसाठी लढत आहेत.” मुख्यमंत्री पुढे म्हणाल्या, “तुम्ही या भागाला इतक्या वर्षांनंतर एक मजबूत व कार्यक्षम सरकार दिले आहे. गेल्या ५ महिन्यांमध्ये दिल्लीचे रूप कसे बदलले आहे, हे सगळ्यांनाच दिसत आहे. सरकार पूर्ण प्रामाणिकपणे, निष्ठेने व समर्पणाने काम करत आहे.”

हेही वाचा..

गोंडा अपघातावर राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला शोक

‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ असे कोणाला म्हणाले राज पुरोहित

तरुण चुग यांनी राहुल गांधींना काय दिला टोला

२ रुपयांत उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे निधन

खासदार बांसुरी स्वराज यांनी यावेळी सांगितले, “आयुष्मान भारत योजना ही दिल्लीमध्ये पूर्वी लागू झाली नव्हती. आमच्या सातही खासदारांना दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागावी लागली होती. मात्र, जेव्हा जनतेने दिल्लीला ‘डबल इंजिन’ सरकार दिले, तेव्हा ही योजना लागू होऊ शकली.” बांसुरी स्वराज यांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचे कौतुक करताना सांगितले, “मला आजही आठवते, २० फेब्रुवारीला त्यांनी शपथ घेतली आणि त्याच संध्याकाळी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिल्लीमध्ये आयुष्मान भारत लागू करण्याचा निर्णय घेतला.”

Exit mobile version