भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत विविध विभागांतील ११,५३५ डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने बुधवारी संसदेत दिली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार, एकूण ७४,००० डब्यांमध्ये आणि १५,००० इंजिनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, “प्रत्येक डब्यात चार सीसीटीव्ही कॅमेरे असतील, ज्यामध्ये प्रत्येक प्रवेशद्वारावर दोन कॅमेरे लावले जातील. तर इंजिनमध्ये सहा सीसीटीव्ही कॅमेरे असतील – समोर, मागे आणि दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक, प्रत्येक केबिनमध्ये एक, आणि डेस्कवर दोन मायक्रोफोनही लावले जातील.
हे सीसीटीव्ही कॅमेरे STQC (Standardization Testing and Quality Certification) संस्थेद्वारे प्रमाणित असतील आणि ते आरडीएसओ (RDSO – Research Designs and Standards Organisation) च्या नवीनतम निकषांनुसार असतील. हे कॅमेरे ताशी १०० किलोमीटर किंवा त्याहून अधिक वेगाने धावणाऱ्या गाड्यांमध्येही उच्च-गुणवत्तेची व्हिडीओ फुटेज देण्यास सक्षम असतील. वैष्णव म्हणाले, “तंत्रज्ञान उन्नती हा एक सतत चालणारा प्रयत्न आहे. भविष्यात रिअल-टाईम मॉनिटरिंग आणि एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) इंटिग्रेशनवर काम केले जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात असले तरी प्रवाशांच्या गोपनीयतेला बाधा येणार नाही, कारण हे कॅमेरे केवळ दरवाज्याजवळील सार्वजनिक हालचाली क्षेत्रातच बसवले जातील.”
हेही वाचा..
सुवेंदु अधिकारींसोबत मोठी दुर्घटना घडली असती…
विदिशामध्ये १० ऑगस्ट रोजी बीईएमएलच्या रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन
राज ठाकरे-बच्चू कडू यांची भेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाही
रशियाकडून अमेरिकेची युरेनियम खरेदी, ट्रम्प म्हणाले-‘मला माहिती नाही, बघावं लागेल’
सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यामागे मुख्य हेतू प्रवाशांच्या सुरक्षेचा दर्जा वाढवणे हा आहे. यामुळे दरोडे, चोरी, तोडफोड, गुन्हेगारी घटना यावर नियंत्रण आणण्यास मदत होईल आणि गुन्हेगारी तपासातही सहाय्य होईल, अशी अपेक्षा आहे. संसदेत विचारण्यात आलेल्या दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात, रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, अनारक्षित डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन, रेल्वेने सामान्य श्रेणीतील प्रवाशांसाठी सुविधांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे.
वैष्णव म्हणाले, “मागील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्येच विविध लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये १,२५० जनरल डब्यांचा वापर करण्यात आला. गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांच्या प्रवासाच्या गरजा लक्षात घेता, भारतीय रेल्वे पुढील ५ वर्षांत १७,००० नॉन-एसी डबे (जनरल/स्लीपर) तयार करणार आहे.”
