“गुजरातला पुरस्कार राजीव गांधी फाउंडेशनने दिला, राहुल गांधींनी आईला विचारावं”

तेलंगणातील भाजप प्रमुख एन. रामचंदर राव यांचा हल्ला 

“गुजरातला पुरस्कार राजीव गांधी फाउंडेशनने दिला, राहुल गांधींनी आईला विचारावं”

तेलंगणातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष एन. रामचंदर राव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “राहुल गांधींमध्ये जर खरंच धमक असेल, तर त्यांनी मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) पक्षाच्या ‘व्होट चोरी’वर खुलेपणाने भाष्य करावं. दुर्दैवाने, ते कधीच ओवैसी, रेवंत रेड्डी किंवा सिद्धरामय्या यांच्याविरोधात बोलत नाहीत. हे सगळेच ‘व्होट चोरी’मुळे निवडून आले आहेत,” असा आरोप राव यांनी केला.

“राहुल गांधींच्या बिहार रॅलीत पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईविरुद्ध आक्षेपार्ह भाषा!

“मोदी-ट्रम्प यांची चर्चा राहुल गांधींच्या समोर झाली होती का?”

विरार दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

राहुल गांधी यांच्या यात्रेत भाषा घसरतेय

ते पुढे म्हणाले, “मी राहुल गांधींना विनंती करतो की त्यांनी एकदा हैदराबादला यावं आणि पाहावं की त्यांच्या काँग्रेस पक्षाने व रेवंत रेड्डी यांनी येथे कशा प्रकारे ‘व्होट चोरी’ करून निवडणूक जिंकली आहे.” दरम्यान, बिहारमध्ये सुरू असलेल्या ‘वोटर अधिकार यात्रे’ दरम्यान राहुल गांधी भाजपच्या गुजरात मॉडेलवर टीका करताना त्याला “मतचोरीचं मॉडेल” असे संबोधले होते. यानंतर भाजपाकडून राहुल गांधी यांच्यावर भाजपाच्या नेत्यांकडून जोरदार टीका होत आहे.

Exit mobile version