पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार

१४.६ लाखांहून अधिक लोक प्रभावित

पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अनेक दशकांनंतर आलेल्या महाभयंकर पुरामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. शनिवारी आलेल्या नव्या अहवालानुसार मुसळधार पावसामुळे झालेल्या अचानक पुरात आणि शहरी भागांत पाणी साचल्याने आणखी २८ जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाब प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (पीडीएमए) च्या आकडेवारीनुसार, सतलुज, रावी आणि चिनाब नद्यांना आलेल्या पुरामुळे आतापर्यंत १,७६९ गावांतील १४.६ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत.

हवामान विभागाने (पीएमडी) इशारा दिला आहे की पंजाब, खैबर पख्तूनख्वा (केपी), पाकिस्तान अधिकृत काश्मीर, इस्लामाबाद आणि पोटोहार भागासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, वादळं आणि वीजांचा कडकडाट होऊ शकतो. त्यामुळे अचानक पूर, शहरी पूर आणि भूस्खलन होण्याची शक्यता आहे. याशिवाय, ईशान्य बलुचिस्तान, आग्नेय सिंध आणि पाकिस्तान अधिकृत गिलगित-बाल्टिस्तानमध्येही संध्याकाळपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा..

अमेरिकेला ठेंगा, मोदी- जिनपिंग ऐतिहासिक भेट

किम जोंग-उन याची चीनच्या बहुपक्षीय मंचावर उपस्थिती

मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने एका कार्यकर्त्याचा मृत्यू

यूकेमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांवर कारवाई; स्टारमर यांची हद्दपारीची घोषणा

पीएमडीने सांगितले की उत्तरी केपी, मुर्री, गल्लियत, रावळपिंडी, इस्लामाबाद आणि ईशान्य पंजाबमध्ये नाल्यांना आणि ओढ्यांना पूर येऊ शकतो. त्याशिवाय लाहोर, गुजरांवाला आणि सियालकोटसारख्या खालच्या भागांत शहरी पूराचा धोका आहे. डोंगराळ भागांत भूस्खलन व मलबा कोसळल्याने रस्ते बंद होऊ शकतात. पीडीएमएने ओकारा आणि साहीवाल जिल्ह्यांनाही धोक्याचा इशारा दिला आहे. प्राधिकरणाने सांगितले की रावी नदीचा वाढणारा जलस्तर पुढील ३६ तासांत सदानी परिसराला पाण्याखाली टाकू शकतो. इशाऱ्यात म्हटलं आहे, “बल्लोकी येथे पाण्याची पातळी वाढल्यास नाल्याच्या तटबंदीवर धोका वाढेल.”

सूत्रांच्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी कसूर शहर वाचवण्यासाठी जाणूनबुजून आरआरए-१ तटबंध फोडला, कारण सतलुज नदीची पातळी १९५५ नंतर पहिल्यांदाच विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. शुक्रवारी पुराचे पाणी देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहर लाहोरपर्यंत पोहोचले आणि झंगसारख्या महत्त्वाच्या शहराला बुडवण्याची भीती व्यक्त करण्यात आली. हा परिसर जवळपास ४० वर्षांतल्या सर्वात भयानक पुराचा सामना करत आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सियालकोट जिल्ह्यातील हेड मराला येथे चिनाब नदीसाठी पुराचा इशारा दिला असून नागरिकांना एसएमएस अलर्ट पाठवले आहेत. मराला, खांकी आणि कादिराबाद हेडवर्क्स येथे मोठ्या पुराचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे आणि नागरिकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version