भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी पाकिस्तान विरुद्ध भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमधील इस्रोच्या शास्त्रज्ञांचे योगदान अधोरेखित केले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान ४०० हून अधिक शास्त्रज्ञांनी रात्रंदिवस काम केले, असे नारायणन म्हणाले. लष्करी कारवाई दरम्यान, निरीक्षण आणि उपग्रहांद्वारे मदत पुरवली जात होती असे त्यांनी सांगितले.
ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (एआयएमए) च्या ५२ व्या राष्ट्रीय व्यवस्थापन परिषदेला संबोधित करताना नारायणन म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षेच्या गरजांसाठी इस्रोने उपग्रह डेटा पुरवला. “ऑपरेशन सिंदूर दरम्यान, सर्व उपग्रह चोवीस तास कार्यरत होते आणि सर्व आवश्यकता पूर्ण करत होते,” असे ते म्हणाले. ४०० हून अधिक शास्त्रज्ञ पूर्ण क्षमतेने दिवसरात्र काम करत होते आणि मोहिमेदरम्यान सर्व पृथ्वी निरीक्षण आणि संप्रेषण उपग्रह पूर्णपणे कार्यरत होते, असे नारायणन म्हणाले.
इस्रो प्रमुख नारायणन म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान, सशस्त्र संघर्षांमध्ये अंतराळ क्षेत्राच्या भूमिकेकडे विशेष लक्ष देण्यात आले. या काळात, स्वदेशी आकाश सारख्या ड्रोन आणि हवाई संरक्षण प्रणालींच्या क्षमतांची मोठ्या प्रमाणात चाचणी घेण्यात आली.
इस्रो प्रमुख म्हणाले की, मानवी अंतराळ मोहीम गगनयान प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ७,७०० हून अधिक जमिनीवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत आणि येणाऱ्या मानवी अंतराळ उड्डाणापूर्वी आणखी २,३०० चाचण्या केल्या जातील. गगनयान मोहिमेअंतर्गत, इस्रो तीन मानवरहित मोहिमा राबवेल, ज्यापैकी पहिली मोहीम या वर्षी डिसेंबरमध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर आणखी दोन मानवरहित मोहिमा राबवल्या जातील.
हे ही वाचा :
“नेपाळमध्ये हिंसाचार शिगेला; पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारीत?”
रशियन बॉम्बिंगमध्ये २० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू
काठमांडू विमानतळ बंद; इंडिगो, एअर इंडियाकडून उड्डाणे रद्द
रेल्वे साइडिंगवर अंधाधुंध गोळीबार
गगनयान प्रकल्पांतर्गत दोन मानवयुक्त मोहिमा राबविण्यासही मंजुरी मिळाली आहे. नारायणन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३५ पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करण्याचे आणि २०४० पर्यंत चंद्रावर भारतीय अंतराळवीर उतरवण्याचे ध्येय इस्रोवर सोपवले आहे.
