राजस्थानमध्ये सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी रेंजरला घेतले ताब्यात!

भारतीय हद्दीत घुसण्याचा करत होता प्रयत्न 

राजस्थानमध्ये सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी रेंजरला घेतले ताब्यात!

राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) एका पाकिस्तानी रेंजरला ताब्यात अटक केली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला असताना, चुकून सीमा ओलांडल्यामुळे पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफ जवानाला ताब्यात घेतल्याच्या काही दिवसांनंतर ही घटना घडली आहे.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजरला बीएसएफच्या राजस्थान फ्रंटियरने ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या रेंजरची ओळख किंवा त्याला पकडण्याच्या विशिष्ट परिस्थितीचा अद्याप खुलासा केलेला नाही. बीएसएफचे अधिकारी पाक रेंजरची चौकशी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर सीमेवरील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय सैनिकाला लवकरच परत आणले जाणार आहे. जवान पूर्णम कुमार शॉ यांच्या पत्नी रजनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी फिरोजपूरमधील बीएसएफ कमांडिंग ऑफिसरची भेट घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी जवान पूर्णम कुमार शॉ यांच्या सुटकेचे आश्वासन दिले आहे.

२४ व्या बटालियनमधील कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ यांना २३ एप्रिल रोजी पाकिस्तान रेंजर्सनी पकडले होते. ते फिरोजपूर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमा चुकून ओलांडून पाकिस्तानी हद्दीत पोहोचले होते. तेव्हापासून त्यांना परत आणण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या सोशल मीडिया हँडलने पूर्णमचे काही फोटो प्रसिद्ध केले होते, ज्यामध्ये ते डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत दिसत होते.

हे ही वाचा : 

सिख नरसंहार : राहुल गांधींची माफी म्हणजे राजकीय ढोंग

पंजाब पोलिसांनी दोन हेरांना केली अटक

लातेहारमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला

सीआरपीएफ मुख्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर पाकिस्तानी महिलेशी लग्न केले!

दरम्यान, या घटनेनंतर, बीएसएफने आपल्या कर्मचाऱ्यांना कडक सूचना जारी केल्या आहेत, ज्यामध्ये कर्तव्यावर असताना अधिक दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर. जवानांना अतिरिक्त सावधगिरी बाळगण्यास आणि गस्त घालताना अनवधानाने सीमा ओलांडू नये असे सांगण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सीमेवर शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

Exit mobile version