दिलासा आणि कृतज्ञता… इराणहून परतलेल्या भारतीयांनी मोदी सरकारचे मानले आभार

वाढती निदर्शने आणि अस्थिर परिस्थिती दरम्यान भारतीयांना इराण सोडण्याचे आवाहन

दिलासा आणि कृतज्ञता… इराणहून परतलेल्या भारतीयांनी मोदी सरकारचे मानले आभार

इराणमधील वाढती निदर्शने आणि अस्थिर परिस्थिती यादरम्यान भारताने आपल्या नागरिकांना देश सोडण्याचे आवाहन केले होते. यानंतर शुक्रवार, १६ जानेवारी रोजी रात्री उशिरा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराणहून भारतीयांना घेऊन आलेले विमान पोहचले. यानंतर मायभूमीत परतल्यावर भारतीय नागरिक इराणहून परतले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि कृतज्ञता दिसून आली.

परराष्ट्र मंत्रालय आणि तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या सूचनांचे पालन झाल्यानंतर इराणहून भारतीयांचे सुखरूप आगमन झाले. ज्यामध्ये विद्यार्थी, यात्रेकरू, व्यावसायिक आणि पर्यटकांचा समावेश होता. भारतीयांना उपलब्ध वाहतुकीच्या पर्यायांचा वापर करून इराण सोडण्यास सांगितले गेले. सरकारने सांगितले की ते घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि तेथील भारतीयांच्या कल्याणासाठी आवश्यक ते करण्यास वचनबद्ध आहेत.

जे भारतीय परतले त्यांनी इराणमधील परिस्थितीबद्दल सांगितले की, तेथील अवस्था वाईट असून निदर्शने, हालचालींवर निर्बंध आणि इंटरनेट खंडित असणे यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट आहे. भारत सरकार खूप सहकार्य करत आहे आणि दूतावासाने आम्हाला शक्य तितक्या लवकर इराण सोडण्याबाबत माहिती दिली, असे आलेल्या लोकांनी सांगितले. “मोदी जी है तो हर चीज मुमकीन है,” असे दिल्लीत उतरल्यानंतर एका भारतीय नागरिकाने सांगितले.

परत आलेल्या आणखी एका व्यक्तीने इराणमधील वाढत्या असुरक्षिततेच्या भावनेबद्दल सांगितले. “आम्ही तिथे एक महिना होतो. पण गेल्या एक- दोन आठवड्यांपासूनच आम्हाला समस्या येत होत्या. जेव्हा आम्ही बाहेर जायचो तेव्हा निदर्शक गाडीसमोर येऊन त्रास देत असत. इंटरनेट बंद होते, त्यामुळे आम्ही आमच्या कुटुंबियांना काहीही सांगू शकत नव्हतो. आम्हाला काळजी वाटत होती. आम्ही दूतावासाशी संपर्कही साधू शकत नव्हतो,” असे ते म्हणाले.

इराणहून परतलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील एका रहिवाशाने सांगितले की, “तिथली निदर्शने धोकादायक होती. भारत सरकारने खूप चांगले प्रयत्न केले आहेत आणि विद्यार्थ्यांना परत आणले आहे,” असे ते म्हणाले. इराणला तीर्थयात्रेसाठी गेलेल्या आपल्या पत्नीच्या मावशीची वाट पाहत असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, “नवी दिल्लीच्या प्रतिसादामुळे त्यांच्या कुटुंबाला विश्वास मिळाला. इराण नेहमीच भारताचा चांगला मित्र राहिला आहे आणि आम्हाला मोदी सरकारवर खूप विश्वास होता, ज्यांनी सतत पाठिंबा दिला. हे शक्य केल्याबद्दल आम्ही भारत सरकारचे आभार मानतो.”

हे ही वाचा:

पुणे–पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा पवारांना धक्का

टी२० विश्वचषकापूर्वी नेपाळचा मोठा डाव

ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग, भाजप महायुती बहुमताकडे

मेहुल चोक्सीचा मुलगा मनी लाँड्रिंगमध्ये सक्रिय!

इराणी रियालच्या विक्रमी नीचांकी घसरणीनंतर २८ डिसेंबर रोजी तेहरानच्या ग्रँड बाजार येथे इराणमधील अशांतता सुरू झाली आणि नंतर ती देशव्यापी निदर्शनांमध्ये पसरली. पाण्याची टंचाई, वीजपुरवठा खंडित होणे, वाढती बेरोजगारी आणि वाढती महागाई यासारख्या अनेक दबावांमुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे, ज्यामुळे जनतेचा रोष आणखी वाढला आहे.

Exit mobile version