सोन्याने पार केली ₹१.६ लाखांची ऐतिहासिक पातळी, चांदीत ₹६,८०० ची वाढ

मध्यपूर्वेतील युद्धसदृश तणावाचा बाजारावर परिणाम

सोन्याने पार केली ₹१.६ लाखांची ऐतिहासिक पातळी, चांदीत ₹६,८०० ची वाढ

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सुरक्षित गुंतवणूक (Safe Haven) म्हणून गुंतवणूकदारांचा कल वाढल्यामुळे भारतीय बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात जोरदार वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर चांदीच्या किमतीत मोठी उसळी येत ती सुमारे ₹८,७०० प्रति किलोने वाढून जवळपास ₹२.७४ लाख प्रति किलोवर पोहोचली. त्याचवेळी एप्रिल डिलिव्हरीसाठी असलेल्या सोने फ्युचर्सच्या किमतीत सुमारे ₹१,६०० प्रति १० ग्रॅमची वाढ होऊन भाव ₹१.६३ लाखांच्या आसपास पोहोचले. या वाढीमागे मध्यपूर्वेतील संघर्ष, जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि डॉलरमधील चढउतार हे मुख्य घटक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
आसाममध्ये सुखोई विमान कोसळले; हवाई दलाचे दोन वैमानिक ठार

रशियन तेलावर अमेरिकेची भारताला ३० दिवसांची सूट

टीम इंडिया फायनलमध्ये!

मुंबईत एटीएसची धडक कारवाई

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे जागतिक गुंतवणूकदारांनी जोखीम असलेल्या मालमत्तांमधून पैसे काढून सोने-चांदीसारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत सोने आणि चांदीची मागणी वाढते आणि किमती झपाट्याने वाढतात. त्यामुळेच जागतिक बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात वाढ दिसून आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा दर सुमारे ५,१७० डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचला, तर चांदीचे दरही मजबूत झाले. गुंतवणूकदारांना युद्धसदृश परिस्थिती, ऊर्जा पुरवठ्यावरील संभाव्य परिणाम आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून या धातूंची निवड करावी लागत आहे.

तज्ज्ञांच्या मते सध्या सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी अस्थिरता (Volatility) आहे. डॉलर इंडेक्समधील बदल, अमेरिका-इराण तणाव आणि अमेरिकेतील रोजगारासंबंधी आकडेवारी यांचा थेट परिणाम या धातूंवर होऊ शकतो. त्यामुळे तातडीने मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा बाजार स्थिर होण्याची वाट पाहण्याचा सल्ला विश्लेषक देत आहेत.

एकूणच, जागतिक राजकीय तणाव वाढत असताना सोने-चांदीच्या किमतींमध्ये चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाईघाईने व्यवहार करण्याऐवजी बाजारातील परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून निर्णय घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

Exit mobile version