भारताच्या मत्स्य क्षेत्रात २०१५ पासून ३९,२७२ कोटींची गुंतवणूक

प्राथमिक स्तरावर सुमारे तीन कोटी मच्छीमार आणि मत्स्यपालकांना मिळतो रोजगार

भारताच्या मत्स्य क्षेत्रात २०१५ पासून ३९,२७२ कोटींची गुंतवणूक

केंद्र सरकारने सांगितले की, भारताचा मत्स्य व्यवसाय (फिशरीज सेक्टर) आता अन्नसुरक्षा, रोजगार आणि निर्यात उत्पन्नात महत्त्वाची भूमिका बजावणारे क्षेत्र बनले आहे. २०१५ पासून आतापर्यंत या क्षेत्रात तब्बल ३९,२७२ कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक करण्यात आली आहे. मत्स्य, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाच्या माहितीनुसार, या क्षेत्रातून प्राथमिक स्तरावर सुमारे तीन कोटी मच्छीमार आणि मत्स्यपालकांना रोजगार मिळतो, तर संपूर्ण व्हॅल्यू चेनमध्ये याच्या जवळपास दुप्पट लोकांना रोजगार उपलब्ध होतो.

मंत्रालयानुसार, भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा एक्वाकल्चर उत्पादक देश बनला असून जागतिक मत्स्य उत्पादनात त्याचा सुमारे ८ टक्के वाटा आहे. देशातील मत्स्य उत्पादन २०१९-२० मधील १४१.६४ लाख टनांवरून २०२४-२५ मध्ये १९७.७५ लाख टनांपर्यंत वाढले आहे, जे सरासरी ७ टक्के वार्षिक वाढ दर्शवते. सागरी उत्पादनांच्या निर्यातीतही मोठी वाढ झाली आहे. २०१३-१४ मध्ये ३०,२१३ कोटी रुपयांवर असलेली निर्यात २०२४-२५ मध्ये ६२,४०८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये कोळंबी (श्रिंप) निर्यातीचा सर्वाधिक वाटा असून त्याची किंमत ४३,३३४ कोटी रुपये आहे.

भारत सध्या सुमारे १३० जागतिक बाजारपेठांमध्ये ३५० पेक्षा अधिक प्रकारची सागरी उत्पादने निर्यात करतो. २०२४-२५ मध्ये एकूण निर्यात मूल्यापैकी ३६.४२ टक्के हिस्सा अमेरिकेला गेला, त्यानंतर चीन, युरोपियन संघ, दक्षिण-पूर्व आशिया, जपान आणि मध्य पूर्व या बाजारपेठांचा क्रम लागतो. निर्यातीत मूल्यवर्धित (value-added) उत्पादनांचा वाटाही वाढत असून तो २.५ टक्क्यांवरून ११ टक्क्यांपर्यंत गेला आहे. याची एकूण किंमत ७४२ मिलियन डॉलरपर्यंत पोहोचली आहे.

दरम्यान, काही मोजक्या उत्पादनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’ (PMMSY) अंतर्गत ट्यूना, सीबास, कोबिया, मड क्रॅब, टायगर श्रिंप आणि समुद्री शैवाल (सीवीड) यांसारख्या उच्च मूल्याच्या प्रजातींना प्रोत्साहन देत आहे. यासोबतच कोल्ड-चेन नेटवर्क, आधुनिक मासेमारी बंदरे आणि डिजिटल ट्रेसिबिलिटी प्रणालीत गुंतवणूक केली जात आहे.

हे ही वाचा:

इराणहून भारताकडे तेल घेऊन येणारे जहाज अचानक चीनकडे वळले

पालघरमध्ये २५१ आदिवासी कुटुंबांची हिंदू धर्मात ‘घरवापसी’

मालदा हिंसाचार प्रकरणात AIMIM नेत्यासह ३५ जणांना अटक

‘समोशांबद्दल’ बोलण्याऐवजी भाजपला संसदेत प्रश्न विचारा!

भारताला २०२५ मध्ये अमेरिकेच्या ‘मरीन मॅमल प्रोटेक्शन अॅक्ट’ (MMPA) अंतर्गत ‘कम्पॅरेबिलिटी’ दर्जा मिळाला असून त्यामुळे अमेरिकेसारख्या मोठ्या बाजारात निर्यात विनाअडथळा सुरू राहणार आहे. सरकारने सांगितले की किनारपट्टी राज्यांमध्ये कोळंबी पकडणाऱ्या ट्रॉलरमध्ये ‘टर्टल एक्सक्लूडर डिव्हाइसेस’ (TED) बसवण्याचे कामही वेगाने सुरू आहे. नियामक पातळीवर, सॅनिटरी इम्पोर्ट परवानगी प्रणाली पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असून ती ‘नॅशनल सिंगल विंडो सिस्टम’शी जोडण्यात आली आहे. त्यामुळे मंजुरीसाठी लागणारा वेळ ३० दिवसांवरून केवळ ७२ तासांपर्यंत कमी झाला आहे.

Exit mobile version