पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या लालगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत, भारत-बांगलादेश सीमेजवळील गावातून ३ रोहिंग्या नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हे तिघेही बांगलादेशमार्गे म्यानमारमध्ये परतण्याच्या तयारीत होते, तत्पूर्वी कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली.
नेपाळच्या तुरुंगातून पळालेली पाकिस्तानची महिला त्रिपुरात
पंतप्रधान मोदी एनडीए कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
९ ऑक्टोबर रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी लालगोला परिसरात छापा टाकून ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींसोबत ४ अल्पवयीन मुलां उपस्थिती होती. पोलिसांनी अल्पवयीन मुलांना सुधारगृहात पाठवले, तर तीन रोहिंग्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की, ही कारवाई सीमा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि अनधिकृत स्थलांतर थांबवण्यासाठी करण्यात आली आहे.
