‘धर्मस्थळ हे महिलांचे दफनस्थळ’ असल्याचे प्रकरणच सपशेल खोटे असल्याचे सिद्ध

आपल्याला मुलगीच नसल्याचे महिलेने आता सांगितले

‘धर्मस्थळ हे महिलांचे दफनस्थळ’ असल्याचे प्रकरणच सपशेल खोटे असल्याचे सिद्ध

कर्नाटकातील धर्मस्थळ याठिकाणी महिलांना दफन केल्याचे प्रकरण प्रचंड चर्चेत असताना आता त्याचा पुरता पर्दाफाश झाला आहे.  सुजाता भट नावाच्या एका वयोवृद्ध महिलेनं कबूल केलं की तिनं “धर्मस्थळात मुलगी हरवल्याची दिलेली साक्ष खोटी होती. या खोट्या कथेमुळे मोठ्या प्रमाणावर “महिला दफन” आणि “लैंगिक अत्याचार” प्रकरणाचा पूर्णपणे पर्दाफाश झाला आहे.

एका युट्यूब चॅनेलशी बोलताना सुजाता भटनं सांगितलं की तिला कार्यकर्ते गिरीश मट्टन्नावर आणि टी. जयंती यांनी खोटी साक्ष द्यायला प्रवृत्त केलं होतं. हे कार्यकर्ते धर्मस्थळ या मंदिर नगरीला बदनाम करण्याच्या मोहिमेत सहभागी होते.

सुरुवातीला भटनं दावा केला होता की तिची ‘मुलगी’ अनन्या भट मे २००३ मध्ये धर्मस्थळात हरवली. तिनं असा आरोप केला होता की ही अनन्या ही १८ वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनी होती. भटनं पुढे असंही सांगितलं होतं की तिला अपहरण करून धमकावण्यात आलं आणि तिला मारहाण करून बेंगळुरूतील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, जिथं ती कोमामध्ये असल्याचंही सांगण्यात आलं होतं.

परंतु आता तिनं कबूल केलं की, “हे खरं नाही. अनन्या भट नावाची माझी कधीही मुलगी नव्हती.” तिनं हेही मान्य केलं की पुरावा म्हणून दाखवलेला फोटो देखील पूर्णपणे बनावट होता.

सुबोध कबुलीत तिनं सांगितलं, “काही लोकांनी मला हे बोलायला सांगितलं. कारण फक्त जमीन विवादाचं होतं. त्याशिवाय काही नाही.” हा जमीन वाद तिच्या आजोबांचा आणि धर्मस्थळ मंदिर प्रशासनाचा होता.

भटनं असंही स्पष्ट केलं की या खोट्या साक्षीसाठी तिला कधीही पैसे देण्यात आले नाहीत किंवा तिनं कोणालाही पैसे दिले नाहीत. तिनं पुढे कर्नाटकच्या जनतेची माफी मागितली: “धर्मस्थळाच्या भक्तांची, कर्नाटकातील आणि देशातील लोकांची मी मनापासून माफी मागते.”

दरम्यान, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (SIT) ने तिला २२ ऑगस्ट रोजी बेल्थंगडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा:

राहुल गांधी पराभवाचे हिस्ट्रीशीटर होऊ शकतात

कोल्हापूरमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी, १० जण जखमी, वाहने जाळली!

यमुनेची पाणी पातळी वाढली; प्रशासन सतर्क

तेजस्वी यादव यांच्यावर गडचिरोलीत एफआयआर!

साइट्सवरील उत्खनन आणि SIT ची तपासणी


ज्या “महिला मृतदेहांच्या दफनस्थळांबाबत” माहिती देण्यात आली होती, तिथं आतापर्यंत कोणतेही महिला अवशेष सापडलेले नाहीत.

२९ जुलैपासून एसआयटीने खोदकाम सुरू केलं. एकूण १३ जागांपैकी सुरुवातीच्या ५ ठिकाणी कोणताही मृतदेह सापडला नाही. ३१ जुलै रोजी सहाव्या ठिकाणी काही हाडं सापडली, पण ती एका पुरुषाची असल्याचं तपासणीत स्पष्ट झालं.

या ठिकाणी पोलिसांना सुमारे १५ हाडं मिळाली, पण कवटी नव्हती. शिवाय, एका महिलेचं डेबिट कार्ड आणि एका पुरुषाचं पॅन कार्ड सापडलं. तपासात कळलं की ते पॅन कार्ड सुरेश नावाच्या व्यक्तीचं होतं. सुरेश हा मद्यपी होता आणि मार्च २०२५ मध्ये त्याचा पिवळ्या आजाराने मृत्यू झाला होता.

वादाचा उगम


या प्रकरणाची सुरुवात एका अज्ञात व्यक्तीनं ३ जूनला पोलिसांकडे तक्रार दाखल करून केली. स्वतःला माजी स्वच्छता कर्मचारी सांगत, त्यानं दावा केला होता की १९९५ ते २०१४ दरम्यान त्याला महिलांचे आणि अल्पवयीन मुलींचे मृतदेह गाडायला भाग पाडलं गेलं.

यानंतर त्यानं न्यायालयातही “पुरावे” सादर केले, ज्यात काही हाडं आणि एक कवटी होती. पण नंतर तपासात स्पष्ट झालं की ती कवटी एका ३० वर्षांपूर्वी मृत झालेल्या पुरुषाची होती.

“मुखवटाधारी व्यक्तीनं” सांगितलं होतं की ६०-१०० मृतदेह १६ फूट खोलीवर गाडले आहेत. SIT ने ग्राउंड पेनिट्रेटिंग रडारचा वापर केला, पण काहीही आढळलं नाही. उत्खननानंतर ठिकाणं रिकामी असल्याचं निष्पन्न झालं.

दरम्यान, ज्या मुखवटाधारी व्यक्तीने मृतदेह गाडले गेल्याचा दावा केला होता. त्याला आता अटक करण्यात आली आहे. त्याने महिलांना दफन केल्याचे खोटे दावे केले होते. मात्र तिथे कोणत्याही प्रकारची हाडे किंवा मृतदेहाचे अवशेष सापडले नाहीत.

Exit mobile version