पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्ध उघड युद्धाची घोषणा केली आहे. दरम्यान, दोन्ही देशांतील वाद चर्चेतून सोडवण्यासाठी इराणने मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सैय्यद अब्बास अराघची यांनी सोशल मीडियावरून हा मध्यस्थीची पुढाकार जाहीर केली.
इराणी परराष्ट्र मंत्री अराघची यांनी लिहिले, “रमजानचा पवित्र महिना हा आत्मसंयम राखण्याचा आणि इस्लामिक जगतात एकता बळकट करण्याचा महिना आहे. अशा वेळी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांनी चांगले शेजारी म्हणून संवादाच्या माध्यमातून सध्याचे मतभेद मिटवणे योग्य ठरेल. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण दोन्ही देशांमधील चर्चा सुलभ करण्यासाठी तसेच परस्पर समज आणि सहकार्य वाढवण्यासाठी कोणतीही मदत देण्यास तयार आहे.”
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन च्या अहवालानुसार, पाकिस्तानने अफगाण तालिबानविरुद्ध ‘ऑपरेशन गजाब लिल-हक’ सुरू केले आहे. पाकिस्तानी माहिती मंत्रालयाने सांगितले की अफगाण तालिबानने गुरुवारी सायंकाळी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील चित्राल, खैबर, मोहम्मद, कुर्रम आणि बाजौर या सीमावर्ती भागांमध्ये गोळीबार केला.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या सीमापार चकमकींबाबत चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी सांगितले की गुटेरेस अफगाणिस्तानातील सुरक्षा दल आणि पाकिस्तानी सुरक्षा दल यांच्यातील सीमापार चकमकींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दुजारिक यांनी पुढे म्हटले, “आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांतर्गत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात आणि सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करावी,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
हे ही वाचा:
पाच वर्षांचा मुलगा शाळेच्या बसमध्ये झोपला आणि सात तास अडकून पडला
कोलकातामध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
केजरीवाल, सिसोदिया यांना दिल्ली कोर्टाने ठरवले निर्दोष
अनिल अंबानी यांच्या निवासस्थान, कार्यालयावर सीबीआयचे छापे
यापूर्वीही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात चकमकी झाल्यानंतर अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतरही कोणताही ठोस तोडगा निघाला नव्हता. दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करारावर स्वाक्षरी केली होती, मात्र काही काळातच तो करार मोडला गेला आणि त्यानंतर सीमारेषेवर वारंवार तणाव निर्माण होत आहे. अलीकडील महिन्यांत विविध देशांनी केलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांचे कौतुक करत दुजारिक यांनी सांगितले की गुटेरेस दोन्ही पक्षांना कूटनीतीच्या मार्गाने मतभेद सोडवण्याचे आवाहन करत आहेत.
